शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

नरेंद्र मोदी म्हणजे वाजपेयी नव्हेत

By admin | Updated: May 19, 2014 23:19 IST

पाकिस्तानच्या तमाम प्रमुख वृत्तपत्रांनी आपली स्थानिक निवडणूक असावी इतके महत्व भारतीय सत्तांतराला दिले आहे.

मेघना ढोके, नाशिक - पाकिस्तानच्या तमाम प्रमुख वृत्तपत्रांनी आपली स्थानिक निवडणूक असावी इतके महत्व भारतीय सत्तांतराला दिले आहे. पहिल्या पानावर मोठ्ठी छायाचित्रे, भारतातील विविध राज्यांत दिसणारे ट्रेंडस, जयललिता-मायावती-ममता-नितीश-लालू ते शरद पवार या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना जनतेने दिलेला कौल असे सारे तपशीलवार वृत्तांकन या वृत्तपत्रात आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून लाभलेल्या पुण्याईवर कॉँग्रेस पक्ष तरला, आता मात्र भारतीय राजकारणाची आणि मतदाराची वीणच बदलली आहे, घराणेशाही मोडीत निघाली आहे, असे या वृत्तांकनांचे म्हणणे दिसते. त्यातून त्यांना आपल्याही जनतेला सुचवायचे आहे की जे भारतात घडते तेच पाकिस्तानातही घडावे. बड्या सरंजामशाही वृत्तीच्या घराण्यांनी आणि नेत्यांनी वेळीच जागे होत जनतेला गृहित धरणे बंद करावे. तेथील अनेक राजकीय विश्लेषक हे मान्य करतात की ‘मोदी इज नो वाजपेयी’.मोदी वाजपेयींइतके मवाळ नाहीत त्यामुळे या मोदी सरकारचा पाकिस्तानवर थेट परिणाम होईल. एकीकडे तालीबान, दुसरीकडे मोदी आणि मधे पिचलेली पाकिस्तानी अर्थव्यवस्था यात पाकिस्तानला फार सावध व्हावे लागेल असे मत द न्यू इंटरनॅशनल या लाहोर आणि इस्लामाबादहून प्रकाशित होणार्‍या वृत्तपत्राच्या अग्रलेखात नोंदवलेले आहे. हा अग्रलेख म्हणतो, ‘मोदींच्या मते ‘आपण ( पाक) त्यांच्याशी जसे वागतो तसे ते आपल्याशी वागतील. नवाज शरीफांनी वेळीच मैत्रीचा हात पुढे करत पाक भेटीचे निमंत्रण दिले हे उत्तम.’ मोदी सत्तारुढ होणार या बातमीपाठोपाठ एक धास्तीही पाकिस्तानी राजकीय विचारवंत आणि अभ्यासकांत उघड निर्माण झालेली दिसते. पाकिस्तानमधले ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉ. हसन अक्सारी रिझवी द डॉन नावाच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, ‘भारतीय जनतेच्या नव्याने जाग्या झालेल्या अस्मितेला अधिक सुखावण्यासाठी मोदी सत्तेत येताच पाकिस्तानला धारेवर धरत मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानला जाब विचारतील. दुसरीकडे मोदी पक्के व्यावसायिक आहेत, ते म्हणतील बाकी चर्चा नंतर आधी भारताला ‘विशेष देशाचा दर्जा’ द्या आणि आमचे उत्पादन तुमच्या बाजारपेठेत थेट उतरू द्या.’ पाकिस्तानी बाजारपेठ भारतीय वस्तूंना खुली करुन देण्याची मागणी आता भारतातून जोर धरेल असाही काहींचा कयास आहे. एकीकडे भारतीय निवडणूक प्रक्रियेचे प्रचंड कौतुक, रक्ताचा एकही थेंब न सांडता महाकाय देशात झालेल्या सत्तांतराचे अप्रूप आणि दुसरीकडे शेजारच्या तुलनेने ‘मवाळ’ लोकशाही देशात प्रचंड बहुमताने उदयास आलेल्या कट्टर ‘धार्मिक’ आणि काहीशा हेकेखोर नेतृत्वाची धास्ती या वर्तमानपत्रात वाचायला मिळते. मोदींनी प्रस्तावित केलेले विकासाचे मॉडेल अभ्यासत पाकिस्ताननेही हे ‘मोदीनॉमिक्स’ गांभिर्याने घ्यावे असे सुप्त आवाहन आणि दुसरीकडे अ‍ॅग्रेसिव्ह मोदींच्या नव्या भारताशी संबंधांची खबरदारी या कात्रीत पाकिस्तानी राजकीय-सामाजिक विश्लेषक सापडलेले दिसतात. निवडणूक निकालांनंतर ‘मोदीं’च्या भारताला कसे ‘हॅण्डल’ करायचे या प्रश्नाची भेदक काळजी पाकिस्तानच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत ठळकपणे अधोरेखित झालेली दिसते. धास्ती-कौतुक-अप्रूप आणि भारताच्या ‘अच्छे दिन आनेवाले है’ या आशावादाचे निखळ कुतूहल पाकिस्तानी वृत्तपत्रातल्या पानांत पसरलेले दिसते. हिंदुत्ववादी ‘मोदी’ सरकारशी मैत्रीचा मूडही ठळकपणे दिसतो.