शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ओळख मिळाल्याचा मध्यरात्री जल्लोष

By admin | Updated: August 2, 2015 01:05 IST

तब्बल ७० वर्षांनंतर आपला देश आणि देशबांधवांचा सहवास मिळाल्याच्या आनंदाच्या जल्लोषाने शुक्रवारची मध्यरात्र हरखून गेली. ना राष्ट्र ना राष्ट्रीयत्वाची ओळख, तसेच शाळा, दवाखाना आणि वीज

ढाका : तब्बल ७० वर्षांनंतर आपला देश आणि देशबांधवांचा सहवास मिळाल्याच्या आनंदाच्या जल्लोषाने शुक्रवारची मध्यरात्र हरखून गेली. ना राष्ट्र ना राष्ट्रीयत्वाची ओळख, तसेच शाळा, दवाखाना आणि वीज या सुविधांशिवाय जीवन जगणाऱ्या भारत आणि बांगलादेशामधील १६२ वस्त्यांतील लोकांना अखेर स्वत:चे वतन आणि ओळख मिळाल्याने गेल्या सात दशकांपासूनच्या रखडलेल्या सीमा हद्दबंदीची समस्या एकदाची सुटली. शुक्रवारी मध्यरात्री भारत-बांगलादेश दरम्यान परस्परांच्या हद्दीतील १६२ वस्त्या आणि भू-प्रदेश हस्तांतरणाच्या घटनेने इतिहास घडविला आणि या वस्त्यांत जल्लोषाला उधाण आले.१७,१६० एकरातील १११ भारतीय वस्त्या बांगलादेशला हस्तांतरित करण्यात आल्या. तसेच बांगलादेशातील ५१ वस्त्या भारतीय हद्दीत समाविष्ट करण्यात आल्या.जवळपास ३७ हजार लोक बांगलादेशातील भारतीय वस्त्यांत राहत होते, तर १४ हजार लोक भारतातील बांगलादेशातील वस्त्यांत राहत होते. गेली ७० वर्षे त्यांनी दु:ख भोगले. आता परस्परांच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांना आपल्या इच्छेनुसार भारतीय किंवा बांगलादेशाचे नागरिकत्व मिळेल. तसेच शैक्षणिक, आरोग्य आणि सरकारी योजना व सुविधांचाही लाभ मिळेल.भारताचे महाप्रबंधक, बांगलादेशच्या सांख्यिकी विभाग आणि कुच बिहारचे जिल्हा दंडाधिकारी व लालमोनीरघाट, पंचगढ, कुरीग्राम, नीलफामडीच्या उपायुक्तांनी दोन्हीकडच्या लोकांची इच्छा जाणून घेतली. यासाठी ७५ पथके कामाला लागली होती. (वृत्तसंस्था)