शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

ओळख मिळाल्याचा मध्यरात्री जल्लोष

By admin | Updated: August 2, 2015 01:05 IST

तब्बल ७० वर्षांनंतर आपला देश आणि देशबांधवांचा सहवास मिळाल्याच्या आनंदाच्या जल्लोषाने शुक्रवारची मध्यरात्र हरखून गेली. ना राष्ट्र ना राष्ट्रीयत्वाची ओळख, तसेच शाळा, दवाखाना आणि वीज

ढाका : तब्बल ७० वर्षांनंतर आपला देश आणि देशबांधवांचा सहवास मिळाल्याच्या आनंदाच्या जल्लोषाने शुक्रवारची मध्यरात्र हरखून गेली. ना राष्ट्र ना राष्ट्रीयत्वाची ओळख, तसेच शाळा, दवाखाना आणि वीज या सुविधांशिवाय जीवन जगणाऱ्या भारत आणि बांगलादेशामधील १६२ वस्त्यांतील लोकांना अखेर स्वत:चे वतन आणि ओळख मिळाल्याने गेल्या सात दशकांपासूनच्या रखडलेल्या सीमा हद्दबंदीची समस्या एकदाची सुटली. शुक्रवारी मध्यरात्री भारत-बांगलादेश दरम्यान परस्परांच्या हद्दीतील १६२ वस्त्या आणि भू-प्रदेश हस्तांतरणाच्या घटनेने इतिहास घडविला आणि या वस्त्यांत जल्लोषाला उधाण आले.१७,१६० एकरातील १११ भारतीय वस्त्या बांगलादेशला हस्तांतरित करण्यात आल्या. तसेच बांगलादेशातील ५१ वस्त्या भारतीय हद्दीत समाविष्ट करण्यात आल्या.जवळपास ३७ हजार लोक बांगलादेशातील भारतीय वस्त्यांत राहत होते, तर १४ हजार लोक भारतातील बांगलादेशातील वस्त्यांत राहत होते. गेली ७० वर्षे त्यांनी दु:ख भोगले. आता परस्परांच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांना आपल्या इच्छेनुसार भारतीय किंवा बांगलादेशाचे नागरिकत्व मिळेल. तसेच शैक्षणिक, आरोग्य आणि सरकारी योजना व सुविधांचाही लाभ मिळेल.भारताचे महाप्रबंधक, बांगलादेशच्या सांख्यिकी विभाग आणि कुच बिहारचे जिल्हा दंडाधिकारी व लालमोनीरघाट, पंचगढ, कुरीग्राम, नीलफामडीच्या उपायुक्तांनी दोन्हीकडच्या लोकांची इच्छा जाणून घेतली. यासाठी ७५ पथके कामाला लागली होती. (वृत्तसंस्था)