शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अद्भुत जपानविषयी थोडंफार, एकाच बेटावर राहतात 100 लोक आणि 400 मांजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:01 IST

जपान या देशाविषयी भारतीयांना खूप आकर्षण आहे. पण माहिती फारशी नाही. ‘लव इन टोकियो’ या चित्रपटामुळे अनेकांना जपानविषयी थोडंफार कळलं.

जपान या देशाविषयी भारतीयांना खूप आकर्षण आहे. पण माहिती फारशी नाही. ‘लव इन टोकियो’ या चित्रपटामुळे अनेकांना जपानविषयी थोडंफार कळलं. जपानी बाहुल्याही प्रसिद्ध. त्यामुळे गाण्यांमध्येही ‘ले गयी दिल, गुडिया जापान की’ यापासून, ‘मुझे तो गुडिया जापानी लगती है’ अशा अनेक गाण्यांत ही बाहुली डोकावते. अमेरिकेने जपानवर टाकलेला अणुबॉम्ब आपल्याला माहीत आहे आणि त्यानंतर राखेतून फिनिक्स पक्षी पुन्हा जशी भरारी घेतो, तशी जपाननेही सर्व क्षेत्रांत घेतली, हेही आपल्याला शिकवलं आहे.असा हा देश तब्बल ६८५२ बेटांमध्ये विभागला गेला आहे. त्यापैकी अनेक बेटं तर जेमतेम एक किलोमीटर आकाराची आहेत. त्यापैकी एका बेटावर सुमारे १00 लोक राहतात आणि तिथं मांजरांची संख्या आहे ४00. तिथं कुत्र्यांना नेण्यास बंदी आहे. जपानचा ९७ टक्के भाग हा चार बेटांत सामावला आहे. म्हणजे ६८४९ बेटांनी केवळ ३ टक्के भूभागच व्यापला आहे. या देशात साक्षरता आहे १00 टक्के. तिथं एकही जण निरक्षर नाही. देशातील पुरुषांचं सरासरी आयुर्मान ८१ तर महिलांचं आयुर्मान ८८ आहे. त्यामुळे देशात वृद्धांची संख्याच अधिक झाली आहे आणि तो देशासाठी चिंतेचा विषय आहे. जपान ही देशातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारत आहे चौथ्या क्रमांकावर.जपानमध्ये ज्वालामुखी असून, त्याचे सतत लहान-मोठे स्फोट होत असतात. इतकंच नव्हे, तर जगात सर्वाधिक भूकंप जपानमध्येच होतात. सरासरी दिवसाला तीन भूकंप. त्यामुळे जपानी लोकांना भूकंपाची सवयच झाली आहे. त्यांनी भूकंप गृहीत धरूनच घरं बांधली आहेत. भूकंपात न कोसळणारी. सर्वांत मोठा भूकंप ११ मार्च २0११ रोजी झाला. त्याची तीव्रता होती ९.१. त्यात हजारो लोक मरण पावले. जपान या धक्क्यातूनही लगेच सावरला. तिथं गुन्ह्यांचं आणि त्यातही हत्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. जपानी मुलं वयाच्या १0व्या वर्षी शाळेत जाऊ लागतात. आपल्यासारखं तिसºया वर्षीच मुलांना शाळेत घालायची त्यांना गरज भासत नाही. जपानच्या वृत्तपत्रांत राजकारण, गुन्हे, चित्रपट कलावंतांची प्रेमप्रकरणं यावर अजिबात भर नसतो. जपानी लोकांना कॉमिक वाचायला खूप आवडतात. तेथील लोक वेळेच्या बाबतीत अतिशय शिस्तशीर असतात. तिथं रेल्वेही १८ सेकंदांपेक्षा अधिक विलंबानं धावत नाहीत. चारच दिवसांपूर्वी एक ट्रेन एका स्टेशनहून २0 सेकंद लवकर निघाली. त्याबद्दल एकाही प्रवाशानं तक्रार केली नाही. तरीही या चुकीबद्दल रेल्वे कंपनीने सर्व प्रवाशांची जाहीर माफी मागितली होती. आपल्याकडे तासन्तास गाड्या उशिरा धावतात. पण अशी दिलगिरी मागितल्याचं कोणाला आठवतंय?