शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

अद्भुत जपानविषयी थोडंफार, एकाच बेटावर राहतात 100 लोक आणि 400 मांजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:01 IST

जपान या देशाविषयी भारतीयांना खूप आकर्षण आहे. पण माहिती फारशी नाही. ‘लव इन टोकियो’ या चित्रपटामुळे अनेकांना जपानविषयी थोडंफार कळलं.

जपान या देशाविषयी भारतीयांना खूप आकर्षण आहे. पण माहिती फारशी नाही. ‘लव इन टोकियो’ या चित्रपटामुळे अनेकांना जपानविषयी थोडंफार कळलं. जपानी बाहुल्याही प्रसिद्ध. त्यामुळे गाण्यांमध्येही ‘ले गयी दिल, गुडिया जापान की’ यापासून, ‘मुझे तो गुडिया जापानी लगती है’ अशा अनेक गाण्यांत ही बाहुली डोकावते. अमेरिकेने जपानवर टाकलेला अणुबॉम्ब आपल्याला माहीत आहे आणि त्यानंतर राखेतून फिनिक्स पक्षी पुन्हा जशी भरारी घेतो, तशी जपाननेही सर्व क्षेत्रांत घेतली, हेही आपल्याला शिकवलं आहे.असा हा देश तब्बल ६८५२ बेटांमध्ये विभागला गेला आहे. त्यापैकी अनेक बेटं तर जेमतेम एक किलोमीटर आकाराची आहेत. त्यापैकी एका बेटावर सुमारे १00 लोक राहतात आणि तिथं मांजरांची संख्या आहे ४00. तिथं कुत्र्यांना नेण्यास बंदी आहे. जपानचा ९७ टक्के भाग हा चार बेटांत सामावला आहे. म्हणजे ६८४९ बेटांनी केवळ ३ टक्के भूभागच व्यापला आहे. या देशात साक्षरता आहे १00 टक्के. तिथं एकही जण निरक्षर नाही. देशातील पुरुषांचं सरासरी आयुर्मान ८१ तर महिलांचं आयुर्मान ८८ आहे. त्यामुळे देशात वृद्धांची संख्याच अधिक झाली आहे आणि तो देशासाठी चिंतेचा विषय आहे. जपान ही देशातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारत आहे चौथ्या क्रमांकावर.जपानमध्ये ज्वालामुखी असून, त्याचे सतत लहान-मोठे स्फोट होत असतात. इतकंच नव्हे, तर जगात सर्वाधिक भूकंप जपानमध्येच होतात. सरासरी दिवसाला तीन भूकंप. त्यामुळे जपानी लोकांना भूकंपाची सवयच झाली आहे. त्यांनी भूकंप गृहीत धरूनच घरं बांधली आहेत. भूकंपात न कोसळणारी. सर्वांत मोठा भूकंप ११ मार्च २0११ रोजी झाला. त्याची तीव्रता होती ९.१. त्यात हजारो लोक मरण पावले. जपान या धक्क्यातूनही लगेच सावरला. तिथं गुन्ह्यांचं आणि त्यातही हत्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. जपानी मुलं वयाच्या १0व्या वर्षी शाळेत जाऊ लागतात. आपल्यासारखं तिसºया वर्षीच मुलांना शाळेत घालायची त्यांना गरज भासत नाही. जपानच्या वृत्तपत्रांत राजकारण, गुन्हे, चित्रपट कलावंतांची प्रेमप्रकरणं यावर अजिबात भर नसतो. जपानी लोकांना कॉमिक वाचायला खूप आवडतात. तेथील लोक वेळेच्या बाबतीत अतिशय शिस्तशीर असतात. तिथं रेल्वेही १८ सेकंदांपेक्षा अधिक विलंबानं धावत नाहीत. चारच दिवसांपूर्वी एक ट्रेन एका स्टेशनहून २0 सेकंद लवकर निघाली. त्याबद्दल एकाही प्रवाशानं तक्रार केली नाही. तरीही या चुकीबद्दल रेल्वे कंपनीने सर्व प्रवाशांची जाहीर माफी मागितली होती. आपल्याकडे तासन्तास गाड्या उशिरा धावतात. पण अशी दिलगिरी मागितल्याचं कोणाला आठवतंय?