शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अद्भुत जपानविषयी थोडंफार, एकाच बेटावर राहतात 100 लोक आणि 400 मांजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:01 IST

जपान या देशाविषयी भारतीयांना खूप आकर्षण आहे. पण माहिती फारशी नाही. ‘लव इन टोकियो’ या चित्रपटामुळे अनेकांना जपानविषयी थोडंफार कळलं.

जपान या देशाविषयी भारतीयांना खूप आकर्षण आहे. पण माहिती फारशी नाही. ‘लव इन टोकियो’ या चित्रपटामुळे अनेकांना जपानविषयी थोडंफार कळलं. जपानी बाहुल्याही प्रसिद्ध. त्यामुळे गाण्यांमध्येही ‘ले गयी दिल, गुडिया जापान की’ यापासून, ‘मुझे तो गुडिया जापानी लगती है’ अशा अनेक गाण्यांत ही बाहुली डोकावते. अमेरिकेने जपानवर टाकलेला अणुबॉम्ब आपल्याला माहीत आहे आणि त्यानंतर राखेतून फिनिक्स पक्षी पुन्हा जशी भरारी घेतो, तशी जपाननेही सर्व क्षेत्रांत घेतली, हेही आपल्याला शिकवलं आहे.असा हा देश तब्बल ६८५२ बेटांमध्ये विभागला गेला आहे. त्यापैकी अनेक बेटं तर जेमतेम एक किलोमीटर आकाराची आहेत. त्यापैकी एका बेटावर सुमारे १00 लोक राहतात आणि तिथं मांजरांची संख्या आहे ४00. तिथं कुत्र्यांना नेण्यास बंदी आहे. जपानचा ९७ टक्के भाग हा चार बेटांत सामावला आहे. म्हणजे ६८४९ बेटांनी केवळ ३ टक्के भूभागच व्यापला आहे. या देशात साक्षरता आहे १00 टक्के. तिथं एकही जण निरक्षर नाही. देशातील पुरुषांचं सरासरी आयुर्मान ८१ तर महिलांचं आयुर्मान ८८ आहे. त्यामुळे देशात वृद्धांची संख्याच अधिक झाली आहे आणि तो देशासाठी चिंतेचा विषय आहे. जपान ही देशातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारत आहे चौथ्या क्रमांकावर.जपानमध्ये ज्वालामुखी असून, त्याचे सतत लहान-मोठे स्फोट होत असतात. इतकंच नव्हे, तर जगात सर्वाधिक भूकंप जपानमध्येच होतात. सरासरी दिवसाला तीन भूकंप. त्यामुळे जपानी लोकांना भूकंपाची सवयच झाली आहे. त्यांनी भूकंप गृहीत धरूनच घरं बांधली आहेत. भूकंपात न कोसळणारी. सर्वांत मोठा भूकंप ११ मार्च २0११ रोजी झाला. त्याची तीव्रता होती ९.१. त्यात हजारो लोक मरण पावले. जपान या धक्क्यातूनही लगेच सावरला. तिथं गुन्ह्यांचं आणि त्यातही हत्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. जपानी मुलं वयाच्या १0व्या वर्षी शाळेत जाऊ लागतात. आपल्यासारखं तिसºया वर्षीच मुलांना शाळेत घालायची त्यांना गरज भासत नाही. जपानच्या वृत्तपत्रांत राजकारण, गुन्हे, चित्रपट कलावंतांची प्रेमप्रकरणं यावर अजिबात भर नसतो. जपानी लोकांना कॉमिक वाचायला खूप आवडतात. तेथील लोक वेळेच्या बाबतीत अतिशय शिस्तशीर असतात. तिथं रेल्वेही १८ सेकंदांपेक्षा अधिक विलंबानं धावत नाहीत. चारच दिवसांपूर्वी एक ट्रेन एका स्टेशनहून २0 सेकंद लवकर निघाली. त्याबद्दल एकाही प्रवाशानं तक्रार केली नाही. तरीही या चुकीबद्दल रेल्वे कंपनीने सर्व प्रवाशांची जाहीर माफी मागितली होती. आपल्याकडे तासन्तास गाड्या उशिरा धावतात. पण अशी दिलगिरी मागितल्याचं कोणाला आठवतंय?