शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या चिमुकलीचं मोदींना पत्र, दोन्ही देशांत हवी शांतता

By admin | Updated: March 14, 2017 21:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशमधील मिळवलेल्या विजयाचं अभिनंदन करण्यासाठी एका पाकिस्तानी मुलीनंही पत्र लिहिलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे मोदींचा वारू चौखुर उधळला आहे. नरेंद्र मोदींच्या या विजयाचा भारताच्या शेजारील राष्ट्रांनीही म्हणजेच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीननंही धसका घेतला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशमधील मिळवलेल्या विजयाचं अभिनंदन करण्यासाठी एका पाकिस्तानी मुलीनंही पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात मुलीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शांती नांदावी, यासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. या मुलीचं नाव अकीदत नाविद असून, ती फक्त 11 वर्षांची आहे.पत्रात ती म्हणते, प्रिय मोदीजी, एकदा मला माझे वडील म्हणाले होते, की लोकांची मनं जिंकणे हे अद्भुत कार्य आहे. कदाचित तुम्ही भारतीयांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच तुम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत विजय मिळाला आहे. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला पाकिस्तानी आणि भारतीयांची मनं जिंकायची असतील तर दोन्ही देशांत शांती नांदणं गरजेचं आहे, यासाठी तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्याची गरज असून, शांतीचा पूल उभारला पाहिजे. तुम्ही ठरवा की एकमेकांकडून काय खरेदी करायचं आणि काय नाही. तुम्ही एकमेकांकडून बुलेट खरेदी करू नका, मात्र पुस्तकं नक्कीच विकत घ्या, दोन्ही देशांनी एकमेकांकडून गन खरेदी करू नका, मात्र औधषं तर खरेदी करू शकता. शेवटी निवड ही आपलीच आहे. शांती की वाद यात काय निवडायचं हे तुम्हीच ठरवणार आहात. तुम्हाला तुमच्या विजयासाठी पुन्हा एकदा अभिनंदन. त्याप्रमाणेच अकीदतचा भाऊ मोरिख यानंही पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बावजा यांना पत्र लिहून दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचं अभिनंदन केलं आहे. अकिदत ही लाहोरमधल्या कॅथेड्रल शाळेत पाचव्या इयत्तेत शिकते. तर तिचा भाऊ 8व्या इयत्तेत शिकत आहे. अकीदत हिला 2016मध्ये नोबेल विजेते कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅनुअल सँटोस यांच्याकडून ग्रीटिंगही देण्यात आलं होतं.