शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरची अस्वस्थता हे उरी हल्ल्याचे कारण

By admin | Updated: September 25, 2016 03:10 IST

उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले

लंडन : उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले आहे. उरी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचा दावा करताना काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेले गोळीबार, त्यात अनेकांचे झालेले मृत्यू, जखमींची संख्या हजारांच्या घरात असणे, कैक लोकांना अंधत्व येणे यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळेच उरी हल्ला झाला असावा, अशा शब्दांत उलट्या बोंबा मारायला पाकिस्तानने सुरुवात केली आहे.उरी येथील दहशतवादी हल्ल्याबाबत भारत पुराव्याशिवाय पाकिस्तानच्या विरोधात बोलत आहे, असा आरोपही शरीफ यांनी केला. काश्मीरमध्ये भारत सरकारकडून जे अन्याय, अत्याचार सुरू आहेत, त्याची उरी हल्ला हा प्रतिक्रिया असू, शकते, असे सांगून, शरीफ यांनी पाकिस्तानचा या हल्ल्याशी अजिबात संबंध नाही, असेच नमूद केले. संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात भाषण करून पाकिस्तानला निघालेले शरीफ काही काळ लंडनमध्ये थांबले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आरोप केला. संयुक्त राष्ट्रांत शरीफ यांनी ८ जुलै रोजी काश्मीरमध्ये चकमकीत ठार झालेला बुरहान वणी याचे वर्णन त्यांनी काश्मिरी जनतेचा नायक असे केले होते. नवाझ शरीफ यांनी थेट दहशतवाद्याचे उदात्तीकरण केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.रविवारी पहाटे उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे सबळ पुरावे असून, भारताने ते पुरावे पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकडे सोपवले आहेत. जानेवारी महिन्यात पंजाबच्या पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेनेच उरीमध्ये हल्ला घडवून आणला होता, असे तपासात आढळून येत आहे. तरीही भारत बेजबाबदारपणे वागत नसल्याचा आणि तपासाशिवाय आरोप करत असल्याचा उलटा आरोप शरीफ यांनी केला. (वृत्तसंस्था)प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाहीउरी येथील दहशतवादी हल्ल्याबाबत भारत पुराव्याशिवाय पाकिस्तानच्या विरोधात बोलत आहे, असा उलटा आरोपही नवाझ शरीफ यांनी केला. काश्मीरमध्ये भारत सरकारकडून जे अन्याय, अत्याचार सुरू आहेत, त्याची उरी हल्ला हा प्रतिक्रिया असू शकते, असे सांगून शरीफ यांनी पाकिस्तानचा या हल्ल्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अजिबात संबंध नाही, असेच नमूद केले. संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तान एकाकीसंयुक्त राष्ट्रे : काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी पाकिस्तानचे सुमारे महिनाभरापासून सुरू असलेले प्रयत्न असफल झाले आहेत. दहशतवादाशी लढण्यावरच संयुक्त राष्ट्रांनी भर दिला आहे. त्यामुळे या मुद्यार पाकिस्तान एकाकी पडला आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली.अकबरुद्दीन यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण चर्चेत आतापर्यंत १३१ देशांची भाषणे झाली आहेत. त्यापैकी १३0 देशांनी पाकिस्तानने उपस्थित केलेला मुद्दा टाळला आहे. याचा अर्थ काय होतो. संयुक्त राष्ट्रांच्या ७१ व्या सर्वसाधारण सभेत बोलणाऱ्या ९0 टक्के देशांनी दहशतवाद हाच आपल्या चिंतेचा प्राथमिक मुद्दा असल्याचे नमूद केले.