शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरची अस्वस्थता हे उरी हल्ल्याचे कारण

By admin | Updated: September 25, 2016 03:10 IST

उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले

लंडन : उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले आहे. उरी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचा दावा करताना काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेले गोळीबार, त्यात अनेकांचे झालेले मृत्यू, जखमींची संख्या हजारांच्या घरात असणे, कैक लोकांना अंधत्व येणे यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळेच उरी हल्ला झाला असावा, अशा शब्दांत उलट्या बोंबा मारायला पाकिस्तानने सुरुवात केली आहे.उरी येथील दहशतवादी हल्ल्याबाबत भारत पुराव्याशिवाय पाकिस्तानच्या विरोधात बोलत आहे, असा आरोपही शरीफ यांनी केला. काश्मीरमध्ये भारत सरकारकडून जे अन्याय, अत्याचार सुरू आहेत, त्याची उरी हल्ला हा प्रतिक्रिया असू, शकते, असे सांगून, शरीफ यांनी पाकिस्तानचा या हल्ल्याशी अजिबात संबंध नाही, असेच नमूद केले. संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात भाषण करून पाकिस्तानला निघालेले शरीफ काही काळ लंडनमध्ये थांबले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आरोप केला. संयुक्त राष्ट्रांत शरीफ यांनी ८ जुलै रोजी काश्मीरमध्ये चकमकीत ठार झालेला बुरहान वणी याचे वर्णन त्यांनी काश्मिरी जनतेचा नायक असे केले होते. नवाझ शरीफ यांनी थेट दहशतवाद्याचे उदात्तीकरण केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.रविवारी पहाटे उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे सबळ पुरावे असून, भारताने ते पुरावे पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकडे सोपवले आहेत. जानेवारी महिन्यात पंजाबच्या पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेनेच उरीमध्ये हल्ला घडवून आणला होता, असे तपासात आढळून येत आहे. तरीही भारत बेजबाबदारपणे वागत नसल्याचा आणि तपासाशिवाय आरोप करत असल्याचा उलटा आरोप शरीफ यांनी केला. (वृत्तसंस्था)प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाहीउरी येथील दहशतवादी हल्ल्याबाबत भारत पुराव्याशिवाय पाकिस्तानच्या विरोधात बोलत आहे, असा उलटा आरोपही नवाझ शरीफ यांनी केला. काश्मीरमध्ये भारत सरकारकडून जे अन्याय, अत्याचार सुरू आहेत, त्याची उरी हल्ला हा प्रतिक्रिया असू शकते, असे सांगून शरीफ यांनी पाकिस्तानचा या हल्ल्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अजिबात संबंध नाही, असेच नमूद केले. संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तान एकाकीसंयुक्त राष्ट्रे : काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी पाकिस्तानचे सुमारे महिनाभरापासून सुरू असलेले प्रयत्न असफल झाले आहेत. दहशतवादाशी लढण्यावरच संयुक्त राष्ट्रांनी भर दिला आहे. त्यामुळे या मुद्यार पाकिस्तान एकाकी पडला आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली.अकबरुद्दीन यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण चर्चेत आतापर्यंत १३१ देशांची भाषणे झाली आहेत. त्यापैकी १३0 देशांनी पाकिस्तानने उपस्थित केलेला मुद्दा टाळला आहे. याचा अर्थ काय होतो. संयुक्त राष्ट्रांच्या ७१ व्या सर्वसाधारण सभेत बोलणाऱ्या ९0 टक्के देशांनी दहशतवाद हाच आपल्या चिंतेचा प्राथमिक मुद्दा असल्याचे नमूद केले.