शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

ईशनिंदा कायद्याच्या पीडितांचा करणार बचाव

By admin | Updated: February 10, 2015 22:46 IST

वादग्रस्त ईशनिंदा कायद्याखाली खटल्यांना सामोरे जात असलेल्या संशयितांपैकी काहींना बळीचा बकरा बनविले गेले असल्याचे पाकिस्तानातील पंजाब

इस्लामाबाद : वादग्रस्त ईशनिंदा कायद्याखाली खटल्यांना सामोरे जात असलेल्या संशयितांपैकी काहींना बळीचा बकरा बनविले गेले असल्याचे पाकिस्तानातील पंजाब सरकारला वाटते. त्यामुळे सरकारने अशा ५० जणांचा न्यायालयात बचाव करण्याचा निर्णय घेतला आहे.पुराव्यांचा अभाव, कमकुवत पुरावे व वकील उपलब्ध नसल्यामुळे दोषी न ठरविल्या गेलेल्या ५० जणांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या भवितव्याचा लवकर निर्णय घेतला जावा, अशी सरकारची भूमिका आहे.सरकारने २०१० पासून विविध न्यायालयांत सुरू असलेल्या ईशनिंदेच्या २६२ खटल्यांपैकी ५० खटल्यांची लवकर निवाड्यासाठी निवड केली आहे. प्रांताच्या एका उच्चस्तरीय समितीने हे खटले जलदगतीने चालविण्याच्या पद्धतीवर चर्चा करण्यासाठी अलीकडेच बैठक घेतली. सुटकेनंतर छळ होण्यापासून संशयितांचा बचाव करण्यासाठी विविध पंथांच्या विचारसरणीशी संबंधित संघटनांना विश्वासात घेण्यावरही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली होती. मुल्तानमध्ये मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील राशीद रहमान यांच्या हत्येनंतर या समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतरची समितीची ही चौथी बैठक होती. रहमान हे ईशनिंदेच्या आरोपीची बाजू न्यायालयात मांडत होते. माजी लष्करशहा झिया उल हक यांनी त्यांच्या राजवटीचे समर्थन करणाऱ्या धार्मिक गटांना खुश करण्यासाठी ईशनिंदा कायदा लागू केला होता. (वृत्तसंस्था)