शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

इंटरनेट स्मार्ट फोनमध्ये चीन भारताच्या पुढे

By admin | Updated: March 20, 2017 01:19 IST

इंटरनेटची उपलब्धता आणि स्मार्ट फोनची मालकी याबाबत चीन भारताच्या कितीतरी पुढे असल्याचे प्यू रिसर्चने जारी केलेल्या

वॉशिंगटन : इंटरनेटची उपलब्धता आणि स्मार्ट फोनची मालकी याबाबत चीन भारताच्या कितीतरी पुढे असल्याचे प्यू रिसर्चने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. प्यू रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ७१ टक्के चिनी उत्तरदात्यांनी आपण इंटरनेट वापरत असल्याचे, तसेच आपल्याकडे स्मार्ट फोन असल्याचे म्हटले आहे. भारतात मात्र, केवळ २१ टक्के उत्तरदात्यांनीच आपण इंटरनेट वापरत असल्याचे, तसेच आपल्याकडे स्मार्ट फोन असल्याचे म्हटले आहे. चीनमधील ६८ टक्के उत्तरदात्यांकडे मोबाइल फोन असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. याउलट भारतात केवळ १८ टक्के उत्तरदात्यांकडेच स्मार्ट फोन असल्याचे दिसून आले. २0१६ च्या वसंतात हे सर्वेक्षण करण्यात आले.२0१३ नंतरच्या काळात चीनमध्ये स्मार्ट फोन असलेल्या नागरिकांची संख्या ३१ टक्क्यांनी वाढली. भारतात हे प्रमाण फक्त ६ टक्के राहिले. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार चीनमधील ९८ टक्के नागरिकांकडे किमान मोबाइल फोन आहेत. भारतात मात्र, मोबाइल फोन असलेल्यांची संख्या ७२ टक्केच आहे. माध्यमिक शिक्षण घेतलेल्या १0 पैकी सुमारे ४ भारतीयांकडे (३८ टक्के) स्मार्टफोन आहे. त्याखाली शिक्षण असलेल्या भारतीयांत हे प्रमाण फक्त ९ टक्के आहे. उत्पन्नातील तफावतीमुळे ही दरी दिसून आली आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भाग या पातळीवरही स्मार्ट फोनच्या बाबतीत मोठा फरक दिसून आला. चीनमधील ७२ टक्के शहरी नागरिकांकडे स्मार्ट फोन आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ६३ टक्के आहे. भारतात मात्र, केवळ २९ टक्के शहरी नागरिकांकडे स्मार्ट फोन आहेत. ग्रामीण भागात तर केवळ १३ टक्के नागरिकांकडेच स्मार्ट फोन आहेत. प्यूने म्हटले की, स्मार्ट फोनच्या मालकीबाबत भारतात स्त्री-पुरुषांतही भेद दिसून आला. २३ टक्के भारतीय पुरुषांकडे स्मार्टफोन आहे. मात्र, महिलांच्या बाबतीत हे प्रमाण १४ टक्केच आहे. (वृत्तसंस्था)