शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: April 30, 2015 01:18 IST

गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का,

तेल अविव (इस्रायल) : गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का, याचा शोध महाराष्ट्रातील शेतकरी येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात घेत आहेत. असे नुकसान झाल्यावर राज्य सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी असल्याने आपणच आपला मार्ग शोधलेला बरा, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधून प्रदर्शनाचा हेतू जाणून घेतला.या प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारासह पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील शेतकरी आले आहेत. मुख्यत: द्राक्ष बागायतदार, डाळिंब, केळी, संत्री अशी फळपिके घेणारे हे शेतकरी आहेत. गारपीट झाल्यास पिकांचे संरक्षण करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या जाळ्या (अ‍ॅन्टी हेलनेट, अ‍ॅन्टी डस्ट) येथे उपलब्ध आहेत. जागतिक दर्जाच्या शेती उपयोगी प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या या कंपन्या आहेत. त्याचा दर, त्याची उपयुक्तता, आयुष्यमान यापासून या जाळ्या लावल्यावर पिकांच्या उत्पादकतेवर त्याचा काय परिणाम होईल का, याची माहिती शेतकरी बारकाईने घेताना दिसले. काही कंपन्यांकडे त्यांनी या प्रकारच्या साहित्याची नोंदणीही केली आहे. संरक्षित शेती पद्धतीच्या दिशेने पाऊल टाकल्यास महाराष्ट्रातील शेतकरीही उत्सुक आहे, हेच त्याचे कारण.हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेला शेतकरी हा ‘बडा’ शेतकरी आहे. ज्याची सध्याची शेती किफायतशीर आहे व पुन्हा त्याला शेतीकडून जादा उत्पन्न हवे आहे. असे शेतकरी प्रदर्शनात जास्त दिसले. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून येण्यासाठी किमान सव्वा ते दीड लाख रुपये खर्च होतो. ड्रीप इरिगेशन आणि शेड नेटमधील मोठ्या कंपन्या, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आदींनी शेतकऱ्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. या कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना स्वखर्चाने आणले आहे. पण शेतकऱ्यांना मात्र खर्च द्यावा लागला आहे. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स, उद्योजक आणि कृषी पदवीधर झालेले तरुण प्रदर्शनासाठी मुद्दाम आले होते.