शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: April 30, 2015 01:18 IST

गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का,

तेल अविव (इस्रायल) : गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का, याचा शोध महाराष्ट्रातील शेतकरी येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात घेत आहेत. असे नुकसान झाल्यावर राज्य सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी असल्याने आपणच आपला मार्ग शोधलेला बरा, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधून प्रदर्शनाचा हेतू जाणून घेतला.या प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारासह पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील शेतकरी आले आहेत. मुख्यत: द्राक्ष बागायतदार, डाळिंब, केळी, संत्री अशी फळपिके घेणारे हे शेतकरी आहेत. गारपीट झाल्यास पिकांचे संरक्षण करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या जाळ्या (अ‍ॅन्टी हेलनेट, अ‍ॅन्टी डस्ट) येथे उपलब्ध आहेत. जागतिक दर्जाच्या शेती उपयोगी प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या या कंपन्या आहेत. त्याचा दर, त्याची उपयुक्तता, आयुष्यमान यापासून या जाळ्या लावल्यावर पिकांच्या उत्पादकतेवर त्याचा काय परिणाम होईल का, याची माहिती शेतकरी बारकाईने घेताना दिसले. काही कंपन्यांकडे त्यांनी या प्रकारच्या साहित्याची नोंदणीही केली आहे. संरक्षित शेती पद्धतीच्या दिशेने पाऊल टाकल्यास महाराष्ट्रातील शेतकरीही उत्सुक आहे, हेच त्याचे कारण.हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेला शेतकरी हा ‘बडा’ शेतकरी आहे. ज्याची सध्याची शेती किफायतशीर आहे व पुन्हा त्याला शेतीकडून जादा उत्पन्न हवे आहे. असे शेतकरी प्रदर्शनात जास्त दिसले. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून येण्यासाठी किमान सव्वा ते दीड लाख रुपये खर्च होतो. ड्रीप इरिगेशन आणि शेड नेटमधील मोठ्या कंपन्या, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आदींनी शेतकऱ्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. या कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना स्वखर्चाने आणले आहे. पण शेतकऱ्यांना मात्र खर्च द्यावा लागला आहे. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स, उद्योजक आणि कृषी पदवीधर झालेले तरुण प्रदर्शनासाठी मुद्दाम आले होते.