शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: April 30, 2015 01:18 IST

गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का,

तेल अविव (इस्रायल) : गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का, याचा शोध महाराष्ट्रातील शेतकरी येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात घेत आहेत. असे नुकसान झाल्यावर राज्य सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी असल्याने आपणच आपला मार्ग शोधलेला बरा, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधून प्रदर्शनाचा हेतू जाणून घेतला.या प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारासह पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील शेतकरी आले आहेत. मुख्यत: द्राक्ष बागायतदार, डाळिंब, केळी, संत्री अशी फळपिके घेणारे हे शेतकरी आहेत. गारपीट झाल्यास पिकांचे संरक्षण करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या जाळ्या (अ‍ॅन्टी हेलनेट, अ‍ॅन्टी डस्ट) येथे उपलब्ध आहेत. जागतिक दर्जाच्या शेती उपयोगी प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या या कंपन्या आहेत. त्याचा दर, त्याची उपयुक्तता, आयुष्यमान यापासून या जाळ्या लावल्यावर पिकांच्या उत्पादकतेवर त्याचा काय परिणाम होईल का, याची माहिती शेतकरी बारकाईने घेताना दिसले. काही कंपन्यांकडे त्यांनी या प्रकारच्या साहित्याची नोंदणीही केली आहे. संरक्षित शेती पद्धतीच्या दिशेने पाऊल टाकल्यास महाराष्ट्रातील शेतकरीही उत्सुक आहे, हेच त्याचे कारण.हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेला शेतकरी हा ‘बडा’ शेतकरी आहे. ज्याची सध्याची शेती किफायतशीर आहे व पुन्हा त्याला शेतीकडून जादा उत्पन्न हवे आहे. असे शेतकरी प्रदर्शनात जास्त दिसले. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून येण्यासाठी किमान सव्वा ते दीड लाख रुपये खर्च होतो. ड्रीप इरिगेशन आणि शेड नेटमधील मोठ्या कंपन्या, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आदींनी शेतकऱ्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. या कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना स्वखर्चाने आणले आहे. पण शेतकऱ्यांना मात्र खर्च द्यावा लागला आहे. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स, उद्योजक आणि कृषी पदवीधर झालेले तरुण प्रदर्शनासाठी मुद्दाम आले होते.