शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

भूकंपानंतर भारताला घुसखोरीचा धोका

By admin | Updated: May 4, 2015 02:31 IST

भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत संपूर्ण जग मानवतेच्या भावनेतून कार्यरत असताना भारतविरोधी शक्ती मात्र यातून काय साधता येईल, हे शोधण्यात गुंतलेल्या आहेत. ही संधी साधून गेला मोठा काळ

जनकपूर, नेपाळ-भारत बॉर्डर : भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत संपूर्ण जग मानवतेच्या भावनेतून कार्यरत असताना भारतविरोधी शक्ती मात्र यातून काय साधता येईल, हे शोधण्यात गुंतलेल्या आहेत. ही संधी साधून गेला मोठा काळ नेपाळमध्ये असलेले पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या भूकंपामुळे भारताला घुसखोरीच्या नव्या धोक्याला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आणि भारतीय दृष्टिकोनातून नेपाळकडे पाहणारे काही ज्येष्ठ लोक नेपाळमध्ये वास्तव्यास आहेत. आपण शेअर करीत असलेली माहिती महत्त्वाची असून आमचे नाव छापू नका, असे त्यांनी ‘लोकमत’ला आवर्जून सांगितले. भारतीय सुरक्षेसाठीची अत्यंत महत्त्वाची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.पाकिस्तानातून पूर्ण क्षमतेने विमाने भरून काठमांडूत येतात, परतताना मात्र त्यात अवघे १०-१५ प्रवासी असतात. पाकिस्तानी काठमांडूमध्ये थांबून पुढे नेपाळ-भारत सीमेवर येऊन स्थायिक होतात. नेपाळ-भारत संपूर्ण सीमा १,७४५ किलोमीटरची आहे. तर रस्त्याला लागून असलेली सीमा १,१०० किलोमीटर आहे. नेपाळमधून ७४ लहान-मोठ्या नद्या भारतात येतात. त्यामुळे संपूर्ण सीमेवर तारांचे कुंपण उभारणे अशक्य आहे. त्यात आता भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात मदत साहित्य घेऊन वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून नेपाळमध्ये असलेले आणि सीमा क्षेत्रात असलेले पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे.