शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भूकंपानंतर भारताला घुसखोरीचा धोका

By admin | Updated: May 4, 2015 02:31 IST

भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत संपूर्ण जग मानवतेच्या भावनेतून कार्यरत असताना भारतविरोधी शक्ती मात्र यातून काय साधता येईल, हे शोधण्यात गुंतलेल्या आहेत. ही संधी साधून गेला मोठा काळ

जनकपूर, नेपाळ-भारत बॉर्डर : भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत संपूर्ण जग मानवतेच्या भावनेतून कार्यरत असताना भारतविरोधी शक्ती मात्र यातून काय साधता येईल, हे शोधण्यात गुंतलेल्या आहेत. ही संधी साधून गेला मोठा काळ नेपाळमध्ये असलेले पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या भूकंपामुळे भारताला घुसखोरीच्या नव्या धोक्याला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आणि भारतीय दृष्टिकोनातून नेपाळकडे पाहणारे काही ज्येष्ठ लोक नेपाळमध्ये वास्तव्यास आहेत. आपण शेअर करीत असलेली माहिती महत्त्वाची असून आमचे नाव छापू नका, असे त्यांनी ‘लोकमत’ला आवर्जून सांगितले. भारतीय सुरक्षेसाठीची अत्यंत महत्त्वाची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.पाकिस्तानातून पूर्ण क्षमतेने विमाने भरून काठमांडूत येतात, परतताना मात्र त्यात अवघे १०-१५ प्रवासी असतात. पाकिस्तानी काठमांडूमध्ये थांबून पुढे नेपाळ-भारत सीमेवर येऊन स्थायिक होतात. नेपाळ-भारत संपूर्ण सीमा १,७४५ किलोमीटरची आहे. तर रस्त्याला लागून असलेली सीमा १,१०० किलोमीटर आहे. नेपाळमधून ७४ लहान-मोठ्या नद्या भारतात येतात. त्यामुळे संपूर्ण सीमेवर तारांचे कुंपण उभारणे अशक्य आहे. त्यात आता भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात मदत साहित्य घेऊन वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून नेपाळमध्ये असलेले आणि सीमा क्षेत्रात असलेले पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे.