शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपानंतर भारताला घुसखोरीचा धोका

By admin | Updated: May 4, 2015 02:31 IST

भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत संपूर्ण जग मानवतेच्या भावनेतून कार्यरत असताना भारतविरोधी शक्ती मात्र यातून काय साधता येईल, हे शोधण्यात गुंतलेल्या आहेत. ही संधी साधून गेला मोठा काळ

जनकपूर, नेपाळ-भारत बॉर्डर : भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत संपूर्ण जग मानवतेच्या भावनेतून कार्यरत असताना भारतविरोधी शक्ती मात्र यातून काय साधता येईल, हे शोधण्यात गुंतलेल्या आहेत. ही संधी साधून गेला मोठा काळ नेपाळमध्ये असलेले पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या भूकंपामुळे भारताला घुसखोरीच्या नव्या धोक्याला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आणि भारतीय दृष्टिकोनातून नेपाळकडे पाहणारे काही ज्येष्ठ लोक नेपाळमध्ये वास्तव्यास आहेत. आपण शेअर करीत असलेली माहिती महत्त्वाची असून आमचे नाव छापू नका, असे त्यांनी ‘लोकमत’ला आवर्जून सांगितले. भारतीय सुरक्षेसाठीची अत्यंत महत्त्वाची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.पाकिस्तानातून पूर्ण क्षमतेने विमाने भरून काठमांडूत येतात, परतताना मात्र त्यात अवघे १०-१५ प्रवासी असतात. पाकिस्तानी काठमांडूमध्ये थांबून पुढे नेपाळ-भारत सीमेवर येऊन स्थायिक होतात. नेपाळ-भारत संपूर्ण सीमा १,७४५ किलोमीटरची आहे. तर रस्त्याला लागून असलेली सीमा १,१०० किलोमीटर आहे. नेपाळमधून ७४ लहान-मोठ्या नद्या भारतात येतात. त्यामुळे संपूर्ण सीमेवर तारांचे कुंपण उभारणे अशक्य आहे. त्यात आता भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात मदत साहित्य घेऊन वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून नेपाळमध्ये असलेले आणि सीमा क्षेत्रात असलेले पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे.