शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारताच्या मदतीचे हात प्रशांत सागरापर्यंत

By admin | Updated: November 20, 2014 01:40 IST

भारताने बुधवारी प्रशांत महासागरातील देशांपर्यंत आपला मदतीचा हात पोहोचवला असून, फिजी या देशाच्या विकासासाठी मदत व कर्ज असे मिळून भारताकडून ८० दशलक्ष डॉलरची मदत वाढविण्यात आली आ

सुवा : भारताने बुधवारी प्रशांत महासागरातील देशांपर्यंत आपला मदतीचा हात पोहोचवला असून, फिजी या देशाच्या विकासासाठी मदत व कर्ज असे मिळून भारताकडून ८० दशलक्ष डॉलरची मदत वाढविण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनीमिरामा यांची भेट घेतली. प्रशांत महासागरातील या देशासाठी १ कोटी डॉलरचा विशेष निधी मोदी यांनी जाहीर केला. सुवामध्ये मोदी यांचे जोरदार स्वागत झाले. ‘वुला मोदी’ (मोदींचे स्वागत) असे फलक जागोजाग लावले होते. या भेटीत मोदी यांनी प्रशांत महासागरातील १२ देशांची बैठक घेतली. फिजीच्या विद्यापीठात मोदी गेले. या विद्यापीठाला भेट देणारे मोदी हे पहिले जागतिक नेते ठरले. प्रशांत महासागरातील १२ देशांसाठी आयटीपीओच्या प्रदर्शनात जागा ठेवण्याचे तसेच नवी दिल्ली येथे व्यापारी कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले. प्रशांत महासागरातील देशांना दिली जाणारी १ लाख २५ हजार डॉलरची मदत २ लाख डॉलरपर्यंत वाढविण्यात आली. भारत व फिजी यांच्या संबंधातील ही नवी सकाळ आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांचा बहिष्कारनरेंद्र मोदी यांचे भाषण फिजीच्या संयुक्त संसदेसमोर झाले. येथील विरोधी पक्षाने या भाषणावर बहिष्कार टाकला. फिजी सरकारने विरोधी पक्षांचा धन्यवाद प्रस्ताव मांडण्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी भाषणावर बहिष्कार टाकला. पण फिजीचे पंतप्रधान वॉरेक बैनीमिरामा यांनी या बहिष्काराबद्दल माफी मागितली व विरोधकांचे हे वागणे अक्षम्य असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी, मी फिजीच्या जनतेच्या वतीने आपली जाहीर माफी मागतो, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)हे वर्तन अक्षम्य आहे. या प्रकाराचा भारत व फिजी यांच्या संबंधावर कोणताही परिणाम होणार नाही. आमच्यापैकी काहीजणांना लोकशाही, शासन कला व राष्ट्रीय धर्म याबाबत आणखी धडे देण्याची गरज आहे, हेच या घटनेने दाखवले आहे. १९८१ नंतर फिजीला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. १९८१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी फिजीला आल्या होत्या.