शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

आयोडिन मिठाची लढाई भारताने जिंकली

By admin | Updated: August 10, 2015 16:47 IST

भारताने दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या आयोडिनयुक्त स्वस्त मिठाच्या पेटेंटची लढाई जिंकली आहे. दांडीयात्रा काढून इंग्रजांविरुद्ध आंदोलन छेडणारे महात्मा गांधी आज हयात असते तर त्यांनाही

नवी दिल्ली : भारताने दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या आयोडिनयुक्त स्वस्त मिठाच्या पेटेंटची लढाई जिंकली आहे. दांडीयात्रा काढून इंग्रजांविरुद्ध आंदोलन छेडणारे महात्मा गांधी आज हयात असते तर त्यांनाही २१ व्या शतकातील या मिठाच्या सत्याग्रहाबद्दल अभिमान वाटला असता.दैनंदिन वापराच्या आयोडिनयुक्त मिठाच्या पेटेंटसाठी चालू असलेल्या कायदेशीर प्रदीर्घ संघर्षात गुजरातच्या भावनगर येथील सार्वजनिक क्षेत्रातील एका प्रयोगशाळेने बाजी मारली. ‘सेंट्रल सॉल्ट अ‍ॅन्ड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ (सीएमएमसीआरआर) या प्रयोगशाळेने हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) या बहुराष्ट्रीय कंपनीचे आव्हान मोडित काढले.१९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढून मिठाचा सत्याग्रह चालविल्याची परिणती भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली. या सत्याग्रहाला ८५ वर्षे झाली असताना मिठाची लढाई कितीतरी पटीने वाढली होती. कायदेशीर लढाईतील यशामुळे भारताला बौद्धिक संपदा अधिकाराचे रक्षण करता येणार आहे. प्रदीर्घ कायदेशीर संघर्ष सदर प्रयोगशाळेची मूळ शाखा असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) २००४ मध्ये नव्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या आयोडिनयुक्त मिठाच्या उत्पादनाच्या पेटेंटसाठी अर्ज केला होता. तेव्हापासूनच कायदेशीर लढाईला प्रारंभ झाला. २००६ मध्ये तत्कालीन हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड सध्याची एचयूएलने पेटेंटला विरोध केला होता. सीएसआयआरने नावीन्यपूर्ण असे काहीही केले नसल्याने पेटेंट रद्द करण्याची मागणी या कंपनीने केली. चढउताराचा हा कायदेशीर संघर्ष दीर्घकाळ सुरूच राहिला. २०१३ मध्ये भारतीय पेटेंट कार्यालयाने पेटेंट देण्यास नकार दिला. त्यामुळे एचयूएलने लढाई जिंकल्यात जमा होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)