शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकत्र

By admin | Updated: September 28, 2016 00:57 IST

पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी

बीजिंग : पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी उच्चस्तरीय चर्चा झाली. दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अलिकडच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताला उघड विरोध करणारा चीन यानिमित्ताने आपली भूमिका बदलताना आता दिसत आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानची बाजू घेतली असली, तरी काश्मीरसंदर्भात चीनने कधीही पाकच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला नाही.गुप्तचर विभागाचे प्रमुख आर. एन. रवी आणि चीनच्या केंद्रीय राजकीय व कायदेविषयक विभागाच्या आयोगाचे महासचिव वांग योंगक्विंग यांच्या अध्यक्षतेत ही चर्चा झाली. भारतीय दूतावासाकडून येथे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दोन्ही देशांनी आपली पद्धत, धोरणे आणि कायदेविषयक माहितीची देवाणघेवाण केली. संभाव्य धोक्यापासून सुरक्षा करण्याचे उपाय, दहशतवादाविरुद्ध लढाई आणि सुरक्षेबाबत सहकार्य या विषयावर दोन्ही देशांत चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकवटल्याचा संदेश यातून गेला आहे. (वृत्तसंस्था)एनएसजीला केला होता विरोध भारताच्या एनएसजी (अणु पुरवठादार समूह) सदस्यत्वाला विरोध करण्यात चीनच अग्रेसर होता, हे विशेष. चीनने खोडा घातल्यामुळेच भारताचे हे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. अर्थात, भारताला विरोध करताना चीनची पाकिस्तानशी असलेली जवळीक कधी लपून राहिली नाही. कारण, पाकच्या काही अतिरेक्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने जेव्हा संयुक्त राष्ट्र संघात प्रयत्न केले तेव्हाही चीननेच खोडा घातला होता. अलिकडच्या काळात भारताबाबत चीनची भूमिका नकारात्मकच राहिली आहे. अशा पार्श्वभूमीवर आता दहशतवादाविरुद्ध भारतासह सहकार्य करण्याची चीनची भूमिका सकारात्मक मानली जाते.