शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकत्र

By admin | Updated: September 28, 2016 00:57 IST

पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी

बीजिंग : पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी उच्चस्तरीय चर्चा झाली. दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अलिकडच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताला उघड विरोध करणारा चीन यानिमित्ताने आपली भूमिका बदलताना आता दिसत आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानची बाजू घेतली असली, तरी काश्मीरसंदर्भात चीनने कधीही पाकच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला नाही.गुप्तचर विभागाचे प्रमुख आर. एन. रवी आणि चीनच्या केंद्रीय राजकीय व कायदेविषयक विभागाच्या आयोगाचे महासचिव वांग योंगक्विंग यांच्या अध्यक्षतेत ही चर्चा झाली. भारतीय दूतावासाकडून येथे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दोन्ही देशांनी आपली पद्धत, धोरणे आणि कायदेविषयक माहितीची देवाणघेवाण केली. संभाव्य धोक्यापासून सुरक्षा करण्याचे उपाय, दहशतवादाविरुद्ध लढाई आणि सुरक्षेबाबत सहकार्य या विषयावर दोन्ही देशांत चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकवटल्याचा संदेश यातून गेला आहे. (वृत्तसंस्था)एनएसजीला केला होता विरोध भारताच्या एनएसजी (अणु पुरवठादार समूह) सदस्यत्वाला विरोध करण्यात चीनच अग्रेसर होता, हे विशेष. चीनने खोडा घातल्यामुळेच भारताचे हे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. अर्थात, भारताला विरोध करताना चीनची पाकिस्तानशी असलेली जवळीक कधी लपून राहिली नाही. कारण, पाकच्या काही अतिरेक्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने जेव्हा संयुक्त राष्ट्र संघात प्रयत्न केले तेव्हाही चीननेच खोडा घातला होता. अलिकडच्या काळात भारताबाबत चीनची भूमिका नकारात्मकच राहिली आहे. अशा पार्श्वभूमीवर आता दहशतवादाविरुद्ध भारतासह सहकार्य करण्याची चीनची भूमिका सकारात्मक मानली जाते.