शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकत्र

By admin | Updated: September 28, 2016 00:57 IST

पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी

बीजिंग : पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी उच्चस्तरीय चर्चा झाली. दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अलिकडच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताला उघड विरोध करणारा चीन यानिमित्ताने आपली भूमिका बदलताना आता दिसत आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानची बाजू घेतली असली, तरी काश्मीरसंदर्भात चीनने कधीही पाकच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला नाही.गुप्तचर विभागाचे प्रमुख आर. एन. रवी आणि चीनच्या केंद्रीय राजकीय व कायदेविषयक विभागाच्या आयोगाचे महासचिव वांग योंगक्विंग यांच्या अध्यक्षतेत ही चर्चा झाली. भारतीय दूतावासाकडून येथे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दोन्ही देशांनी आपली पद्धत, धोरणे आणि कायदेविषयक माहितीची देवाणघेवाण केली. संभाव्य धोक्यापासून सुरक्षा करण्याचे उपाय, दहशतवादाविरुद्ध लढाई आणि सुरक्षेबाबत सहकार्य या विषयावर दोन्ही देशांत चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकवटल्याचा संदेश यातून गेला आहे. (वृत्तसंस्था)एनएसजीला केला होता विरोध भारताच्या एनएसजी (अणु पुरवठादार समूह) सदस्यत्वाला विरोध करण्यात चीनच अग्रेसर होता, हे विशेष. चीनने खोडा घातल्यामुळेच भारताचे हे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. अर्थात, भारताला विरोध करताना चीनची पाकिस्तानशी असलेली जवळीक कधी लपून राहिली नाही. कारण, पाकच्या काही अतिरेक्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने जेव्हा संयुक्त राष्ट्र संघात प्रयत्न केले तेव्हाही चीननेच खोडा घातला होता. अलिकडच्या काळात भारताबाबत चीनची भूमिका नकारात्मकच राहिली आहे. अशा पार्श्वभूमीवर आता दहशतवादाविरुद्ध भारतासह सहकार्य करण्याची चीनची भूमिका सकारात्मक मानली जाते.