शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

'भारताचा आदर्श समोर ठेवा' असं म्हणालोच नाही, पाकिस्तान लष्करप्रमुखांची पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 13:25 IST

पाकिस्तानने भारताचा आदर्श समोर ठेवला पाहिजे असं म्हणलोच नसल्याचा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार बाजवा यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - पाकिस्तानने भारताचा आदर्श समोर ठेवला पाहिजे असं म्हणलोच नसल्याचा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार बाजवा यांनी केला आहे. काही दिवसांपुर्वी पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी कमार बाजवांनी वक्तव्य केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत ही माहिती चुकीची असल्याचं सांगितलं आहे. 
 
लष्करप्रमुखांनी रावळपिंडीत अधिका-यांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्य यासंबंधीच्या बातम्या आणि प्रतिक्रिया चुकीच्या असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे. 
 
गेल्याच आठवड्यात पाकिस्तानधील वृत्तपत्र नेशनने यासंबंधी वृत्त देताना डिसेंबरमध्ये बाजवा यांची अधिका-यांसोबत बैठक झाली असल्याचं सांगितलं आहे. 'लष्कराला सरकारमध्ये हस्तक्षेप करत सरकार चालवण्याचा काहीच अधिकार नाही. भारतात लष्कराच्या हस्तक्षेपाशिवाय लोकशाही व्यवस्था सुरळीत चालू आहे असून त्यांना ते योग्यप्रकारे जमलं आहे', असं लष्करप्रमुख कमार बाजवा यावेळी बोलल्याच या वृतात सांगण्यात आलं होतं. 
 
तसंच या बैठकीत लष्करप्रमुख कमार बाजवा यांनी अधिका-यांनी 'आर्मी अॅण्ड नेशन' हे पुस्तक वाचण्याचं आवाहनदेखील केलं. या पुस्तकात भारतात लोकशाही का यशस्वी ठरली यासंबंधी लिहिण्यात आलं आहे. मात्र प्रवक्ते आसिफ गफूर यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.
 
या वृत्तामुळे पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला होता. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानने सत्ता आपल्या हाती घेतली असताना लष्करप्रमुखांचं हे वक्तव्य त्यांच्यासाठी खूपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक होतं.