शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

भारतीय उपखंड युरेशियात उच्चांकी वेगाने कसा घुसला?

By admin | Updated: May 6, 2015 00:02 IST

८० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) जेव्हा युरेशियाच्या प्रतलात शिरले तेव्हा भारताने खंडीय वेगाचा उच्चांक गाठला.

हिमालय निर्मितीची चित्रकथा : संशोधनातून उकलले गुढ रहस्य; दोन प्रवाहांनी खेचले भारताला उत्तरेकडेवॉशिंग्टन : ८० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) जेव्हा युरेशियाच्या प्रतलात शिरले तेव्हा भारताने खंडीय वेगाचा उच्चांक गाठला. त्यावेळी दुहेरी प्रतल घर्षणामुळे ही घटना घडली असे अमेरिकेच्या एमआयटी (मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) संस्थेत करण्यात आलेल्या नव्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. खंड एकमेकाकडे सरकण्याच्या प्रक्रियेत भारताने हा गूढ उच्चांक गाठला आहे. १४० दशलक्ष वर्षांपूर्वी भारत हा सुपरखंडाचा एक भाग होता. गोंडवन या नावाने ओळखला जाणाऱ्या या प्रदेशाने संपूर्ण दक्षिण गोलार्ध व्यापला होता. १२० दशलक्ष वर्षांपूर्वी आता ज्याला आपण भारत म्हणतो तो भूभाग तुटला व उत्तरेकडे दरवर्षी ५ सें. मी. या गतीने सरकू लागला. ८० दशलक्ष वर्षांपूर्वी या सरकण्याचा वेग वाढला व दरवर्षी १५ सें.मी. गतीने हा भाग उत्तरेकडे सरकू लागला. हा वेग प्रतल सरकण्याचा अत्युच्च वेग मानला जातो. ५० दशलक्ष वर्षांपूर्वी भारत युरेशिया यांची टक्कर झाली व त्यातून हिमालयाचा जन्म झाला. भारत युरेशियाकडे जलद गतीने कसा सरकला असेल याचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न संशोधक करत होते. त्याचे उत्तर एमआयटी संस्थेतील भूगर्भतज्ज्ञांना मिळाले असून, त्यानुसार भारताला उत्तरेकडे खेचणारे दोन प्रवाह होते. पृथ्वीवरील प्रतलापैकी एक प्रतल दुसऱ्या प्रतलात घुसतो हा त्यातील एक प्रवाह आहे. एक प्रतल आकुंचित झाल्यामुळे तो आजूबाजूचे सर्व वस्तुमान ओढून घेतो. त्यामुळे दोन प्रतल असे आकुंचित झाल्यास खेचले जाण्याचा वेग वाढतो. (वृत्तसंस्था)लक्षावधी वर्षांपूर्वी घडलेल्या या नैसर्गिक उत्पाताची उकल नेपाळला बसलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपानंतर झाली आहे. संशोधन करणाऱ्या एमआयटीच्या पथकाला हिमालयाच्या परिसरात अवश्ोष सापडले असून, ते या प्राचीन काळातील उत्पाताचे साक्षीदार असावेत असे मानले जात आहे.नेपाळ भूकंपानंतर झाली उकलया निष्कर्षाला आल्यानंतर शास्त्रज्ञांनी प्रतल खेचण्याच्या या संकल्पनेचे एक मॉडेल बनवले. त्यातील भारताच्या प्रतलाने उच्चांकी वेग कसा गाठला असेल याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानुसार ज्यावेळी ही खेचाखेच झाली त्यावेळी भारतीय प्रतलावर दोन घटकांचा दबाव होता. आकुंचित होणाऱ्या दोन प्रतलांची रुंदी व त्यांच्यातील अंतर! हे दोन प्रतल कमी रुंद असून व एकमेकांपासून जास्त अंतरावर असतील, तर भारतीय प्रतल जास्त वेगाने खेचला गेला असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.