शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

भारतातील भाज्यांमुळे पाकिस्तानमध्ये 'अच्छे दिन'

By admin | Updated: December 9, 2014 16:07 IST

महागाईतून दिलासा मिळण्याची भारतीयांची प्रतिक्षा अद्याप कायम असली तरी भारतातील भाज्यांमुळे पाकिस्तानमध्ये 'अच्छे दिन' आल्याचे चित्र आहे.

ऑनलाइन लोकमत 

पेशावर, दि. ९ - महागाईतून दिलासा मिळण्याची भारतीयांची प्रतिक्षा अद्याप कायम असली तरी भारतातील भाज्यांमुळे पाकिस्तानमध्ये 'अच्छे दिन' आल्याचे चित्र आहे. भारतातून आयात केल्या जाणा-या भाज्यांमुळे पाकिस्तानमधील महागाई घटली असून यामुळे पाकमधील 'आम आदमी'ला दिलासा मिळाला आहे. 
पाकिस्तानमधील भाजी बाजारात यापूर्वी चीनमध्ये भाज्या आयात केल्या जात होत्या. पण आता भारतातून भाज्या आयात करण्याचे प्रमाण वाढल्याने पाकमधील भाजी बाजारातील महागाईचा फुगा फुटला आहे. भारतातून टॉमेटो आणि मटार मोठ्या प्रमाणात पाकमध्ये दाखल होत आहे. पाकमध्ये मटारची गोणी ३ हजार रुपयांमध्ये मिळायची. मात्र भारतातून आयात केलेला मटार यापेक्षाही स्वस्त दरात मिळू लागला आहे.  यामुळे पाकमधील बाजारपेठेत मटारचे भाव थेट १२०० रुपयांपर्यंत गडगडले आहे. तर हीच अवस्था टॉमेटोचीही आहे. भारतातील टॉमेटोमुळे पाकमधील टॉमेटोचे दर कमी झाले आहे.आता तिथे ७०० रुपयांत २२ किलो आणि २०० रुपयात १२ किलो टॉमेटे मिळू लागले आहे. चालू हंगामात भारतातून आत्तापर्यंत भाज्यांचे २५ ट्रक आले असून त्यापैकी १५ ट्रक पेशावर आणि उर्वरित १० ट्रक काबूलमधील बाजारपेठेत पाठवण्यात आले आहे. भारतातील स्वस्त भाज्यांचा फटका पाकिस्तानमधील शेतक-यांना बसू लागल्याने स्थानिक शेतक-यांमध्ये नाराजी पसरली आहे,