शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भारतातील धार्मिक असहिष्णूतेमुळे गांधीजींना धक्का बसला असता - ओबामा

By admin | Updated: February 6, 2015 09:01 IST

गेल्या काही वर्षांत भारतातील वाढत्या धार्मिक असहिष्णूतेमुळे महात्मा गांधींना धक्का बसला असता, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. ६ - गेल्या काही वर्षांत भारतातील वाढत्या धार्मिक असहिष्णूतेमुळे महात्मा गांधींना धक्का बसला असता, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे. भारत दौ-यातील निरोपाच्या भाषणावेळी बराक ओबामा यांनी धार्मिक कट्टरतेवरून भाजपाला कोणताही डोस पाजला नव्हता असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केल्याच्या दुस-याच दिवशी बराक ओबामांनी एका कार्यक्रमात हे विधान करत भारताचे कान टोचले आहेत. गुरूवारी अमेरिकेतील 'नॅशनल प्रेयर कॉन्फरन्स' दरम्यान ते बोलत होते.
'मी आणि मिशेल नुकतेच भारतातून परत आलो, तो अतिशय सुंदर आणि विविधतेने नटलेला असा देश आहे.  मात्र गेल्या काही वर्षांत काही धर्माचे लोक फक्त वेगळा वारसा व श्रद्धेच्या आधारावर इतर धर्मांतील लोकांना लक्ष्य करत आहेत. देशाला उदार मतवादी बनवण्यात मोठा वाटा असणा-या महात्मा गांधींनाही हे सर्व पाहून धक्का बसला असता' असे ओबामा म्हणाले. गेल्या काही काळात झालेल्या हिंसेबद्दल बोलत असताना त्यांनी हे मत मांडले. मात्र ही हिंसा केवळ एका धर्मापुरती मर्यादित नव्हती असे सांगत त्यांनी कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे नाव घेणे टाळले. ओबामांचे हे विधान भाजपाच्या विचारसरणीवरील अप्रत्यक्ष टीका असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी 'दलाई लामा' यांचीही स्तुती केली. 'तिबेटचे सर्वोच्च नेते असलेले दलाई लामा आपले चांगले मित्र' असल्याचे ते म्हणाले. मानवता व स्वातंत्र्य यांचा प्रचार करण्यास दलाई लामा आम्हाला नेहमीच प्रेरित करतात, असेही त्यांनी सांगितले.