शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

किनारपट्टीवरील पाच कोटी लोकांचे जीवन धोक्यात?

By admin | Updated: November 9, 2015 22:55 IST

हवामानातील बदलामुळे मुंबईसह भारतीय किनारपट्टीवरील साडेपाच कोटी लोकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता असून तापमान चार अंश सेल्सियसवर गेल्यास समुद्राची

वॉशिंग्टन : हवामानातील बदलामुळे मुंबईसह भारतीय किनारपट्टीवरील साडेपाच कोटी लोकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता असून तापमान चार अंश सेल्सियसवर गेल्यास समुद्राची पातळी वाढून जगभरातील अर्धा अब्जावधी लोकांच्या वस्त्या बुडण्याची शक्यता आहे, असा गंभीर इशारा अमेरिकेतील क्लायमेट सेंट्रल या संस्थेने दिला आहे.३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबरदरम्यान पॅरिस येथे होत असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल या विषयावरील परिषदेच्या काही आठवड्यांपूर्वीच या संस्थेने हा निष्कर्ष काढला आहे. पृथ्वीवरील तापमान दोन अंश सेल्सियसवर आणणे, हा या परिषदेचा उद्देश आहे. तथापि, हे उद्दिष्ट साध्य करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. वाढत्या तापमानामुळे समुद्राची पातळी वाढून शांघाय आणि शांतौ (चीन), हावडा आणि मुंबई, तसेच हनोई आणि बांगलादेशातील खुल्ना किनारपट्टीवरील जनजीवन धोक्यात येऊ शकते, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले.जागतिक तापमान दोन अंश सेल्सियसवर आणल्यास हा धोका बव्हंशी कमी होऊ शकतो. जागतिक तापमान दोन अंश सेल्सियसने वाढल्यास भारतातील २० दशलक्ष लोकांची, तर चीनमधील ६४ दशलक्ष लोकांची घरे बुडण्याची शक्यता आहे.