शहरं
Join us  
Trending Stories
1
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
2
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
6
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
7
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
8
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
9
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
10
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
11
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
12
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
13
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
14
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
15
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
16
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
17
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
18
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
19
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
20
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

प्रत्येक संकटात भारताची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:53 IST

राजकीय व भौगोलिक अडथळे असताना तसेच आपल्या येथील दूतावासांवर दहशतवादी हल्ले होऊनही भारत युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या प्रत्येक भागात सहकार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली.

हेरात : राजकीय व भौगोलिक अडथळे असताना तसेच आपल्या येथील दूतावासांवर दहशतवादी हल्ले होऊनही भारत युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या प्रत्येक भागात सहकार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण हेरात प्रांतातील अफगाण-भारत मैत्री धरणाचे पंतप्रधान मोदी व अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. त्यानंतर मोदी बोलत होते. दहशतवाद धुडकावल्याबद्दल अफगाण जनतेची प्रशंसा करून मोदी म्हणाले की, तुमच्यातील दुफळीचा केवळ या राष्ट्रावर बाहेरून वर्चस्व गाजवू पहाणाऱ्यांनाच लाभ होईल. अफगाणिस्तानातील युद्ध राष्ट्र निर्मितीचे नव्हते, तर त्याने येथील एका पिढीचे भविष्य हिसकावून घेतले. शूर अफगाण जनता विध्वंस व मृत्यूच्या दूतांना थारा दिला जाणार नाही, असा संदेश देत आहे. दहशतवादाचा पराभव करण्यात अफगाणिस्तानला जेव्हा यश येईल तेव्हा जग अधिक सुरक्षित आणि सुंदर होईल, असेही ते म्हणाले. अफगाणिस्तानसोबत उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या सहकार्याचा या युद्धग्रस्त देशाच्या प्रत्येक भागापर्यंत विस्तार केला जाईल व या भागीदारीचा अफगाण समुदायाच्या प्रत्येक भागाला लाभ मिळेल. मोदी गनींच्या उपस्थितीत म्हणाले की, ‘तुमच्या डोळ्यात मी भारताबद्दल अपार प्रेम पाहिले आहे. तुमच्या स्मित हास्यात मी या संबंधांचा आनंद पाहिला आहे. तुमच्या दृढ मिठीत मी आमच्या मैत्रीचा विश्वास अनुभवला आहे. ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखालीअफगाण-भारत मैत्री धरण इराण सीमेलगतच्या हेरात प्रांतात आहे. चिस्त- ए- शरीफ भागात हरिरूड नदीवरील हे धरण आधी सलमा धरण म्हणून ओळखले जात होते. भारताने तब्बल 1700कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या धरणामुळे ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शिवाय ४२ मेगावॅट वीज निर्मितीही होणार आहे. हे धरण विटा आणि सिमेंटने नाही तर आमच्या मैत्रीचा विश्वास आणि अफगाणी, भारतीयांच्या साहसातून साकार झाले आहे. अफगाण लोक आपले चांगले भवितव्य घडविण्यासाठी खूप उत्सुक असून, ते त्याला पात्र आहेत, असे त्यांनी म्हटले. आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात मोदींनी अफगाणची शांतता प्रक्रिया, हेरातमध्ये भारतीय दूतावासावर झालेला दहशतवादी हल्ला आणि देशाच्या पुनर्उभारणीच्या कामाशी संबंधित मुद्यांना स्पर्श केला. तुमच्या देशात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट व्हावीत, असे ते म्हणाले.