शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाचा पुन्हा हादरा!

By admin | Updated: May 13, 2015 02:21 IST

आठ हजारांहून बळी घेणाऱ्या व लाखोंचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने अद्यापही न सावरलेल्या नेपाळमध्ये मंगळवारी दुपारी पुन्हा मोठा भूकंप झाला

काठमांडू/ नवी दिल्ली : आठ हजारांहून बळी घेणाऱ्या व लाखोंचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने अद्यापही न सावरलेल्या नेपाळमध्ये मंगळवारी दुपारी पुन्हा मोठा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ७.३ तीव्रतेची नोंद झालेल्या या भूकंपाचे जोरदार धक्के भारताच्या पूर्व आणि उत्तरेकडील राज्यांना बसले. या ताज्या भूकंपामुळे नेपाळमध्ये ४२ जण ठार तर १ हजाराहून लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतात या भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बिहारला बसला व त्याने १७ जणांचा बळी घेतला. या नव्या भूकंपामुळे नेपाळप्रमाणेच भारतात पूर्वेला आसाम, पश्चिमेला गुजरात व दक्षिणेला चेन्नईपर्यंतच्या पट्ट्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले.दुपारी १२.३५ वाजता आलेल्या मुख्य भूकंपानंतर नेपाळमध्ये भूकंपाचे आणखी सात धक्के जाणवले. त्याने काठमांडूच्या उत्तरेस असलेल्या सिंधुपालचौक व ढोलाका या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्राणहानी झाली व मागच्या भूकंपात वाचलेली घरे व इमारतीही जमीनदोस्त झाल्या, असे दिल्लीतील नेपाळी दूतावासाने म्हटले आहे. पूर्व व उत्तर भारतालाही भूकंपाचे धक्के बसले. त्यानंतर ६.२, ५.४ आणि ४.८ तीव्रतेचे तीन भूकंपपश्चात धक्के बसले. नेपाळमधील या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि चेन्नईतही जाणवले, पण या ठिकाणी कोणतीही वित्त वा जीवितहानी झाली नाही. याआधी २५ एप्रिलला आलेल्या भूकंपातही बिहारमध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. (वृत्तसंस्था)