शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

पाणीटंचाईमुळे मानवी स्थलांतराचा मोठा धोका

By admin | Updated: May 5, 2016 03:09 IST

हवामान बदलामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई विकासावर परिणाम करून मानवी स्थलांतराला भाग पाडू शकते व भारतासह जगभर संघर्ष होऊ शकतो, असा इशारा जागतिक बँकेने

वॉशिंग्टन : हवामान बदलामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई विकासावर परिणाम करून मानवी स्थलांतराला भाग पाडू शकते व भारतासह जगभर संघर्ष होऊ शकतो, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. सध्या भारतात अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे. जागतिक बँकेच्या ‘हाय अँड ड्राय : क्लायमेट चेंज, वॉटर अँड इकॉनॉमी’ या नावाचा हा अहवाल मंगळवारी प्रसिद्धीस देण्यात आला. त्यात म्हटले आहे की, वाढती लोकसंख्या, वाढते उत्पन्न आणि विस्तारणाऱ्या शहरांत पाण्याची मागणी प्रचंड वेगाने वाढत असून, ती अधिकच वाढणार आहे. त्या तुलनेत पुरवठा अनियमित व खात्रीचा नाही. जगातच पाणीटंचाई ही आर्थिक स्थैर्य आणि विकासाला बाधक ठरली आहे व त्यात हवामान बदलाने भयंकर भर घातली आहे, असे जागतिक बँकेचे जिम योंग किम यांनी म्हटले. फार मोठ्या लोकसंख्येचे जे देश जलस्रोतांचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करणार नाहीत तेथील लोक प्रदीर्घ काळपर्यंत नकारात्मक आर्थिक परिस्थितीत राहतील, असे जिम किम यांनी म्हटले.भारतात पाण्याच्या बचतीची गरज भारतात पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व कार्यक्षमरीत्या करण्याची गरज असल्याचेही जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारतात पाण्याची मागणी वाढत असून पाणीटंचाईही वाढती आहे. गुजरातेत भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. यापुढे गुजरातमधून पाणी मिळविणे खूप खर्चिक झाले आहे. तेथील शेतकरी पीक पद्धतीत बदल करणे किंवा सिंचनासाठी तंत्रज्ञानाचा अधिक कार्यक्षम उपयोग करण्याऐवजी शहरांत स्थलांतर करीत आहेत, असे जागतिक बॅँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.