शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अणुहल्ल्याच्या धमक्या देउ नका

By admin | Updated: October 2, 2016 01:02 IST

पाकिस्तानने भारताला दिलेल्या अणुहल्ल्याच्या धमकीला अमेरिकेने तीव्र आक्षेप घेतला आहे. अशा धमक्या देणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे, अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेने

वॉशिंग्टन : पाकिस्तानने भारताला दिलेल्या अणुहल्ल्याच्या धमकीला अमेरिकेने तीव्र आक्षेप घेतला आहे. अशा धमक्या देणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे, अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेने आपली नाराजी पाकिस्तानला कळविली आहे. पाकिस्तानने यापुढेही अशाच धमक्या दिल्या, तर त्याचे गंभरी परिणाम होतील, असेच अमेरिकेने या संदेशातून सूचित केले आहे.आम्ही याबाबत (अणुहल्ल्याच्या धमकीला अमेरिकेचा आक्षेप) त्यांना अनेकदा स्पष्टपणे सांगितले आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले. अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. तथापि, पाकिस्तानला कोणत्या पातळीवर हा संदेश देण्यात आला हे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले नाही. आपला देश भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा उपयोग करू शकतो, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी गेल्या १५ दिवसांत वारंवार म्हटले होते. आसिफ यांच्या या विधानाबाबत विचारले असता हा अधिकारी म्हणाला की, ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. जर भारताने आमच्यावर युद्ध लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला नष्ट करू. पाकिस्तानी लष्कर भारताच्या कोणत्याही दुस्साहसाला तोंड देण्यास सज्ज आहे, असे आसिफ यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. आमची अण्वस्त्रे शोभेची नाहीत. जर अशी स्थिती निर्माण झाली तर आम्ही त्यांचा उपयोग करून भारताला उद्धवस्त करू, असे पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाने ओबामा प्रशासनाच्या भुवया उंचावल्या असून याला प्रमुख पाकिस्तानी नेतृत्वाचा बेजबाबदारपणा मानले जात आहे. संयुक्त राष्ट्रात पाकला पाठिंबा नाही - भारतसंयुक्त राष्ट्र : पाकव्याप्त काश्मीरातील सर्जिकल हल्ल्यांचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणाऱ्या पाकिस्तानला तेथे कोणाचाही पाठिंबा मिळाला नसल्याचे भारताने म्हटले आहे. शस्त्रसंधीवर लक्ष ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या संघटनेने नियंत्रण रेषेवर प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचा गोळीबार पाहिला नसल्याचे दावे संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तानातील संयुक्त राष्ट्र सैन्य निगराणी गटाने (यूएनएमओजीआयपी) सर्जिकल हल्ल्याबाबत कोणताही गोळीबार प्रत्यक्षपाहिला नाही, असा दावा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी केला होता. अकबरुद्दीन यांनी हा दावा फेटाळून लावला. कोणी पाहिल्याने अगर न पाहिल्याने वस्तुस्थिती बदल नाही, असे अकबरुद्दीन म्हणाले. (वृत्तसंस्था)मुत्सद्देगिरीने मुद्दा सोडवासंयुक्त राष्ट्र : भारत आणि पाकिस्तानने काश्मीरसह आपसातील सर्व मुद्दे चर्चा व मुत्सद्देगिरीद्वारे शांततापूर्ण पद्धतीने सोडवावेत असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी केले आहे. दोन्ही पक्षांनी मान्य असेल तर त्यांच्यात मध्यस्थी करण्याची आपली तयारी असल्याचेही ते म्हणाले. उरी हल्ल्यानंतर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना आणि वाढत्या तणावाबाबत बान चिंताक्रांत आहेत, असे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले. भारत खोटारडा - पाकसीमापार हल्ला केल्याचा भारताचा दावा खोटा असल्याचे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना सांगितले. संयुक्त राष्ट्रातील पाकच्या कायम प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी बान यांची भेट घेऊन देशाची भुमिका मांडली. वाढता तणाव आणि संकटाची जबाबदारी सर्वस्वी भारतावर आहे, असेही त्या म्हणाल्या. पाकने संयम ठेवला आहे. तथापि, आक्रमकता आणि चिथावणीखोर कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्या म्हणाल्या.