शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

भारतीय चॅनेल्ससारखा फक्त TRP चा विचार करू नका, देशाचा विचार करा - पाकिस्तानच्या कानपिचक्या

By admin | Updated: March 28, 2016 15:20 IST

केवळ टेलिव्हिजन रेटिंगचा विचार करून बातम्या देतात असा आरोप करत पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या नियामक मंडळाने संवेदनशील पद्धतीने बातमीदारी करण्याचे आवाहन प्रसारमाध्यमांना केले आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 28 - भारतीय प्रसारमाध्यमे विधीनिषेधशून्य वागतात आणि केवळ टेलिव्हिजन रेटिंगचा विचार करून बातम्या देतात असा आरोप करत पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या नियामक मंडळाने संवेदनशील पद्धतीने बातमीदारी करण्याचे आवाहन प्रसारमाध्यमांना केले आहे.
लाहोर, कराची व इस्लामाबादमध्ये घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नियामक मंडळाने सगळ्या प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे. आपले व्यावसायिक कर्तव्य पार पाडण्याच्या नादात अतिउत्साहीपणा करू नका, त्यामुळे राष्ट्राचा अॅक्शन प्लॅन धोक्यात येऊ शकतो अशी तंबीही देण्यात आली आहे.
भारतीय प्रसारमाध्यमे निव्वळ व्यावसायिक नफ्यातोट्याचा विचार करत असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाऊ नका, असे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी ब्रसेल्सच्या हल्ल्यांच्यावेळी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ज्या संवेदनशीलतेने वार्तांकन केले त्या व्यावसायिक वृत्तीचे पालन करा असा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय प्रसारमाध्यमांच्या नादी लागून मॅरेथॉन सेशन्स करत बसाल आणि राष्ट्राप्रती संवेदनशीलता दाखवली नाहीत तर पाकिस्तानबाबत देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरीह अस्थिरतेचा संदेश जाईल असा इशारा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना देण्यात आला आहे.
अशा अवघड प्रसंगी वार्तांकन करताना प्रत्येकवेळी सकारात्मक व सारासार विचार करून प्रगल्भ वृत्तीचे दर्शन घडवावे अशी अपेक्षा पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने प्रसारमाध्यमांकडून व्यक्त केली आहे.