शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

भारतीय चॅनेल्ससारखा फक्त TRP चा विचार करू नका, देशाचा विचार करा - पाकिस्तानच्या कानपिचक्या

By admin | Updated: March 28, 2016 15:20 IST

केवळ टेलिव्हिजन रेटिंगचा विचार करून बातम्या देतात असा आरोप करत पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या नियामक मंडळाने संवेदनशील पद्धतीने बातमीदारी करण्याचे आवाहन प्रसारमाध्यमांना केले आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 28 - भारतीय प्रसारमाध्यमे विधीनिषेधशून्य वागतात आणि केवळ टेलिव्हिजन रेटिंगचा विचार करून बातम्या देतात असा आरोप करत पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या नियामक मंडळाने संवेदनशील पद्धतीने बातमीदारी करण्याचे आवाहन प्रसारमाध्यमांना केले आहे.
लाहोर, कराची व इस्लामाबादमध्ये घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नियामक मंडळाने सगळ्या प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे. आपले व्यावसायिक कर्तव्य पार पाडण्याच्या नादात अतिउत्साहीपणा करू नका, त्यामुळे राष्ट्राचा अॅक्शन प्लॅन धोक्यात येऊ शकतो अशी तंबीही देण्यात आली आहे.
भारतीय प्रसारमाध्यमे निव्वळ व्यावसायिक नफ्यातोट्याचा विचार करत असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाऊ नका, असे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी ब्रसेल्सच्या हल्ल्यांच्यावेळी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ज्या संवेदनशीलतेने वार्तांकन केले त्या व्यावसायिक वृत्तीचे पालन करा असा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय प्रसारमाध्यमांच्या नादी लागून मॅरेथॉन सेशन्स करत बसाल आणि राष्ट्राप्रती संवेदनशीलता दाखवली नाहीत तर पाकिस्तानबाबत देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरीह अस्थिरतेचा संदेश जाईल असा इशारा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना देण्यात आला आहे.
अशा अवघड प्रसंगी वार्तांकन करताना प्रत्येकवेळी सकारात्मक व सारासार विचार करून प्रगल्भ वृत्तीचे दर्शन घडवावे अशी अपेक्षा पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने प्रसारमाध्यमांकडून व्यक्त केली आहे.