शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरुद्ध गरळ ओकू नका : शरीफ

By admin | Updated: December 20, 2015 03:03 IST

भारताशी नुकत्याच सुरू झालेल्या शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी भारताविरुद्ध कोणतीही वक्तव्ये करू नका, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ

इस्लामाबाद : भारताशी नुकत्याच सुरू झालेल्या शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी भारताविरुद्ध कोणतीही वक्तव्ये करू नका, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपले मंत्री आणि सहकाऱ्यांना दिला आहे.शरीफ यांच्या एका विश्वासू सहकाऱ्याचा हवाला देऊन ‘द नेशन’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘दफन केलेले मुद्दे उकरून काढणारी वक्तव्ये करण्यापेक्षा शांतता चर्चेला प्रोत्साहन देणारी’ वक्तव्ये करा. शांततेस आणखी चालना मिळावी यासाठी प्रोत्साहन द्या,’ असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. शांतता प्रक्रियेला नुकसान होईल, अशी कोणतीही वक्तव्ये करण्यापासून मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांना रोखण्यात आल्याचे हे वृत्त म्हणते.भारताशी संबंध सुधारण्याबाबत नवाज शरीफ आशावादी असून, भारत-पाक संबंध सुधारल्यास त्याचा फायदा संपूर्ण दक्षिण आशियाला होईल, असे शरीफ यांना वाटते. भारतातून येत असलेल्या काही वक्तव्यांवर शरीफ नाराज आहेत; पण हे भारत सरकारचे धोरण नसावे, असे शरीफ यांना वाटते. उभय पक्ष चर्चेसाठी एकत्र आल्यानंतर काश्मीर, दहशतवाद आणि व्यापार या मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची शरीफ यांची इच्छा आहे, असे या वृत्तात म्हटले. (वृत्तसंस्था)पाकचे लष्करी नेतृत्वही राजी?अन्य एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने या वृत्तात पुढे म्हटले आहे की, भारतासोबतच्या शांतता चर्चेबाबत शरीफ आणि लष्करी नेतृत्व यांचे एकमत झाले आहे; महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर समझोता करू नये, असे या दोघांनाही वाटते. शरीफ आणि लष्करी अधिकारी यांच्यात एकमत झाले असेल तर ही सकारात्मक घडामोड आहे, असे विश्लेषकांना वाटते. पुढील महिन्यात बैठकभारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकताच पाकिस्तान दौरा केला होता. त्यात उभय देशांतील सर्वंकष चर्चा सुरू करण्यास सहमती झाली होती. चर्चेचा आराखडा तयार करण्यासाठी दोन्ही देशांच्या विदेश सचिवांची पुढील महिन्यात बैठक होणार आहे.संवाद आवश्यकच - मसूद खानपाकिस्तानशी संवाद साधण्याबाबत भारत गंभीर आहे, त्यामुळे संवादामुळेच दोन्ही देशांना पुढे जाता येईल असे विधान पाकिस्तानचे चीनमधील माजी राजदूत मसूद खान यांनी केले आहे. पाकिस्तानने नेहमीच संवादाचा आग्रह धरला होता आणि भारताने घेतलेली आताची भूमिका म्हणजे आमचा नैतिक विजयच आहे असे मतही त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. भारताशी चर्चा सुरू करण्यासाठी पाकने वारंवार प्रयत्न केले हे दोन अण्वस्त्रसंपन्न देशांत संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. सध्या दोन्ही देशांनी घेतलेली भूमिका हा सकारात्मक संकेत आहे. पुढील महिन्यामध्ये आगामी प्रक्रिया ठरविण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव भेटतील, असेही खान यांनी सांगितले. विश्वासाची भावना वाढीस लागण्यासाठी दोन्ही देशांच्या लोकांंमध्ये संपर्क, संवाद वाढण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.मोदी - शरीफ भेट जानेवारीत?स्वित्झर्लंडमधील दावोस-क्लोस्टर्स येथे जानेवारीत ४६वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होणार असून, या फोरमसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरिफ उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या दोघांची तेथेही भेट होण्याची शक्यता आहे.