शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय परराष्ट्र सचिवांशी सर्व मुद्यांवर चर्चा -शरीफ

By admin | Updated: February 14, 2015 23:41 IST

पाकिस्तान भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या दौऱ्याचे स्वागत करील. या दौऱ्यात काश्मीरसह सर्व मुद्यांवर चर्चा होईल, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.

लाहोर : पाकिस्तान भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या दौऱ्याचे स्वागत करील. या दौऱ्यात काश्मीरसह सर्व मुद्यांवर चर्चा होईल, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. शरीफ यांनी पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या संपादकांच्या परिषदेसोबत (सीपीएनई) बैठक घेतली. बैठकीत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पाकिस्तानला शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण संबंध हवे आहेत. त्यामुळे भारतीय परराष्ट्र सचिवांच्या पाक दौऱ्याचे आम्ही स्वागतच करू. जर भारतीय परराष्ट्र सचिव येथे आले तर पाक काश्मीरसह सर्व मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा करील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ शरीफ यांच्यासह आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी इतर सार्क देशांच्या पंतप्रधानांशी संपर्क साधून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर त्यांनी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली. मोदींच्या या क्रिकेट डिप्लोमसीला भारत-पाक संबंधांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारे म्हटले जाते. उभय देशांतील मुत्सद्दीसंबंध सहा महिन्यांपासून ठप्प आहेत. पाकच्या नवी दिल्लीतील उच्चायुक्तांनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी चर्चा केल्याने भारताने गेल्या आॅगस्टमध्ये पाकिस्तानसोबतची परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा रद्द केली होती. (वृत्तसंस्था) जयशंकर भारताचे इतर सार्क देशांसोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी लवकरच सार्क देशांचा दौरा करतील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. मोदी यांनी शरीफ यांच्याशी चर्चा करण्यापूर्वीच ओबामांची शरीफ यांच्याशी चर्चा झाली होती.