शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामन, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
2
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
3
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
4
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
5
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
6
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
7
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
8
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
9
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
10
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
11
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
12
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
13
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
14
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
15
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
16
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
17
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
18
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
19
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
20
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न

मलेशिया सीमेवरील ‘ते’ मृतदेह रोहिंग्याचे?

By admin | Updated: May 26, 2015 01:44 IST

मलेशिया व थायलंडच्या सीमेवर जंगलामध्ये मोठ्या संख्येने मृतदेह पुरल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या दफन स्थानांवरून हे मृतदेह रोहिंग्या मुस्लिमांचे असावेत असा अंदाज आहे.

क्वालालंपूर : मलेशिया व थायलंडच्या सीमेवर जंगलामध्ये मोठ्या संख्येने मृतदेह पुरल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या दफन स्थानांवरून हे मृतदेह रोहिंग्या मुस्लिमांचे असावेत असा अंदाज आहे. मानवी तस्कर या दफनभूमींचा वापर करीत असावेत, अशी भीती मलेशियाचे गृहमंत्री झाहिद हामिदी यांनी व्यक्त केली आहे.मलेशियन वर्तमानपत्रांच्या माहितीनुसार एका मानवी शिबिराच्या ठिकाणी शंभर मृतदेह आढळून आले आहेत. गेल्या महिनाभराच्या काळामध्ये असे मृतदेह, त्यांचे अवशेष व स्थलांतरितांची बेकायदेशीर शिबिरे मलेशिया व थायलंडच्या सीमेवरील जंगलात अनेक ठिकाणी आढळली आहेत. बांगलादेश व म्यानमारमधून पळालेले रोहिंग्या बोटींद्वारे या भागामध्ये उतरत असून त्यांच्या अशा अनेक ठिकाणी तात्पुरत्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे रोहिंग्यांच्या अवैध स्थलांतराबरोबर तस्करीची समस्याही अंदमानच्या टापूतील हिंदी महासागरालगतच्या सर्व देशांमध्ये वाढली आहे.मृतदेह सापडण्याच्या घटनेचे वर्णन मलेशियातील प्रमुख पोलीस अधिकारी खालीद अबू बकर यांनी अत्यंत दु:खी घटना असे केले आहे. या परिसरामध्ये साधारणत: १३९ सामुदायिक दफनभूमी आढळल्या आहेत. या सर्व अवशेषांची न्यायवैद्यक तपासणी होणार असल्याचेही खालीद यांनी स्पष्ट केले आहे.१० मे पासून ३६०० रोहिंग्या मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया यांच्या किनाऱ्यावर उतरले असावेत असे सांगण्यात येते. या दफनभूमींमुळे म्यानमार आणि बांगलादेशमधून पूर्वेस बोटींनी येणाऱ्या रोहिंग्यांचा प्रश्न अधिकच गंभीर होत असल्याचे जाणवत आहे. २९ मे रोजी थायलंडमध्ये होणाऱ्या बैठकीत मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार व इतर देश यावर लवकरात लवकर तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)४बांगलादेशातून पळून जाणारे लोक मानसिकदृष्ट्या रोगी आहेत, इतर देशांमध्ये आश्रय शोधण्यापेक्षा बांगलादेशात जीवन चांगले आहे, असे धक्कादायक विधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी केले आहे. ४पळून जाणाऱ्या या लोकांमुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थलांतर करणाऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही शिक्षा दिली पाहिजे, कारण त्यांच्यामुळे पळून जाणाऱ्या व्यक्तींचे प्राणही धोक्यात जात आहेत, असे त्या म्हणाल्या.