शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले

By admin | Updated: October 27, 2016 17:22 IST

पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांसाठी पाठिंबा देऊन चीन भारतावर वेळोवेळी कुरघोडी करत असल्याचं समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमतचीन, दि. 27- पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांसाठी पाठिंबा देऊन चीन भारतावर वेळोवेळी कुरघोडी करत असल्याचं समोर आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातल्या सोशल मीडियावरून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा जोरदार प्रचार सुरू झाला. अनेक चिनी वस्तूंवर भारतातील व्यापारी वर्ग आणि ग्राहकांनी बहिष्कार घातला. त्यामुळे चीनच्या बाजारावरही त्याचा परिणाम झाला. मात्र आता चीनला जाग आली असून, चीननं भारतानं आमच्या वस्तूंवर सातत्यानं बहिष्कार टाकत राहिल्यास दोन्ही देशांतील संबंध बिघडतील, असा इशारा दिला आहे."चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घातल्यास भारतात चीन करत असलेल्या गुंतवणुकीवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल, यासाठी दोन्ही देशांकडून द्विपक्षीय सहकार्य गरजेचं आहे. मात्र दोन्ही देशांतील लोकांकडून तसा समजुतदारपणा पाहायला मिळत नाही आहे", असे चीनचे भारतातील दूतावास शी लियान म्हणाले आहेत."दक्षिण आशियात भारत हा चीनचा सर्वात मोठा भागीदार आहे. तसेच जगातील वस्तू निर्यात करणारा सर्वात मोठा नववा देश आहे. भारतातील अनेक व्यापा-यांनी चीनमध्ये बनवलेल्या फटाक्यांसह अनेक वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. चीन-पाकिस्तान यांच्यातील जवळिकीमुळेच भारतात चिनी वस्तूंबाबत नकारात्मक प्रचार होतो आहे. मात्र हा बहिष्काराला कोणताही कायदेशीर आधार नाही. दिवाळी या सणाशी संबंधित वस्तूंवरच हा बहिष्कार मर्यादित नसून त्याचा इतर सणांच्या वस्तूंवरही परिणाम होतो", असं शी लियान यांनी सांगितलं आहे. दरम्यान 2015मध्ये भारत आणि चीन द्विपक्षीय व्यापार 71.6 अब्ज डॉलरच्या घरात होता, मात्र तो आता 50 अब्ज डॉलर इतका खाली आला आहे. चीन फक्त भारतात 2 टक्केच व्यापार निर्यात करत असल्याचंही शी लियान म्हणाले आहेत.