शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 13:26 IST

चीननं पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 21 - चीननं पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा भारतात आल्यानं चीननं आगपाखड केली आहे. बिहारमध्ये आयोजित होणा-या आंतरराष्ट्रीय संमेलनात दलाई लामा सहभागी झाले आहेत. त्यावरून चीननं भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानं चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा विचार करून त्याला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये, असंही चीननं सांगितले आहे. दलाई लामा यांना आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागासाठी भारतानं दिलेल्या निमंत्रणाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असंही चीननं म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले, भारताने चीनचा कडवा विरोध पूर्णपणे झुगारुन देत तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना बौद्ध धर्मीयांच्या 14व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलावले आणि त्यांनीच या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्या कृत्याचा चीन निषेध करतो, असंही चीननं म्हटलं आहे. चीनच्या स्पष्टीकरणात चुनयिंग यांनी म्हटले, की भारताच्या या कृतीवर चीन पूर्णपणे नाराज आहे आणि यास आम्ही कडाडून विरोध करत आहोत आणि भारताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही चीन म्हणाला आहे. चीन आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक मुद्द्यांवर भारताला विरोध करत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारताच्या ह्यएनएसजीह्ण (आण्विक पुरवठादार समूह) सदस्यत्वासाठी चीनचा विरोध केला होता. 48 सदस्य असलेल्या या समूहाच्या बैठकीत भारताच्या सदस्यत्वाचा मुद्दा नसल्याचे चीननं म्हटलं होतं. चीन हा भारताला कायम त्रास देण्याचाच प्रयत्न करत असतो.