शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

पाकमधील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान

By admin | Updated: September 29, 2016 00:30 IST

रीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट

लाहोर : उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग ढोणी याच्या जीवनावरील शुक्रवारी प्रदर्शित होणारा चित्रपटही पाकिस्तानात न दाखविण्याचा निर्णय तेथील वितरकांनी घेतला आहे.चित्रपट व्यावसायिकांना अशी भीती आहे की, परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर भारतीय चित्रपटावर येथे बंदीची मागणी होऊ शकते. एक वितरक सिनेप्लेक्सचे मालक नदीम मंडविवल्ला यांनी सांगितले की, मी निराशावादी नाही; पण वस्तुस्थिती ही आहे की, गत काही वर्षांत हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित झाल्याने पाकिस्तानच्या चित्रपट व्यवसायाला एक उंची मिळाली आहे. मी एवढीच अपेक्षा करतो की, दीर्घ काळासाठी हा तणाव राहायला नको. काही काळापुरते प्रतिबंध लावले तर आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही; पण दीर्घ काळासाठी जर प्रतिबंध लावले, तर अनेक टॉकीज आणि मल्टीप्लेक्स बंद पडतील. चित्रपट समीक्षक उमर अलवी यांनी सांगितले की, सिनेमा टॉकीज आणि महसूल वाढल्याने पाकिस्तानातील चित्रपट उद्योगाने कात टाकली आहे. हा व्यवसाय चांगला चालण्यासाठी वर्षातून किमान ५० ते ६० चित्रपट तयार व्हायला हवेत; पण एवढ्या चित्रपटांची येथे निर्मिती होत नाही.(वृत्तसंस्था)सलमान खानची मध्यस्थीदिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांच्या आगामी चित्रपटात पाक कलावतं असल्याच्या कारणास्तव न मुंबई व महाराष्ट्रात प्रदर्शित न होउ देण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्यानंतर अभिनेता सलमान खान याने त्या वादात मध्यस्थी करण्याचे ठरविले आहे. सलमान खान स्वत: राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. मनसेने पाक कलावंतांवर बंदी घालण्याची घोषणा करण्याआधी आधी हा चित्रपट तयार झाला असल्याने तो प्रदर्शित होण्यात अडथळे आणू नये, अशी भूमिका तो मांडणार असल्याचे कळते.तो निर्णय केंद्र सरकारने घ्यावा - सैफ अली खानभारतीय चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार असावेत का किंवा पाकिस्तानी कलावंतांचे कार्यक्रम भारतात व्हावेत का, याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, असे अभिनेता सैफ अली खानने म्हटले आहे. सरकार जो निर्णय घेईल, तो सारेच मान्य करतील असे सांगून तो म्हणाला की, या प्रश्नाबाबत सतत उलटसुलट चर्चा होत असते. त्यावर एकच कायमस्वरूपी निर्णय सरकारने घेतल्यास वाद निर्माण हेणार नाहीत.