शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान

By admin | Updated: September 29, 2016 00:30 IST

रीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट

लाहोर : उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग ढोणी याच्या जीवनावरील शुक्रवारी प्रदर्शित होणारा चित्रपटही पाकिस्तानात न दाखविण्याचा निर्णय तेथील वितरकांनी घेतला आहे.चित्रपट व्यावसायिकांना अशी भीती आहे की, परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर भारतीय चित्रपटावर येथे बंदीची मागणी होऊ शकते. एक वितरक सिनेप्लेक्सचे मालक नदीम मंडविवल्ला यांनी सांगितले की, मी निराशावादी नाही; पण वस्तुस्थिती ही आहे की, गत काही वर्षांत हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित झाल्याने पाकिस्तानच्या चित्रपट व्यवसायाला एक उंची मिळाली आहे. मी एवढीच अपेक्षा करतो की, दीर्घ काळासाठी हा तणाव राहायला नको. काही काळापुरते प्रतिबंध लावले तर आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही; पण दीर्घ काळासाठी जर प्रतिबंध लावले, तर अनेक टॉकीज आणि मल्टीप्लेक्स बंद पडतील. चित्रपट समीक्षक उमर अलवी यांनी सांगितले की, सिनेमा टॉकीज आणि महसूल वाढल्याने पाकिस्तानातील चित्रपट उद्योगाने कात टाकली आहे. हा व्यवसाय चांगला चालण्यासाठी वर्षातून किमान ५० ते ६० चित्रपट तयार व्हायला हवेत; पण एवढ्या चित्रपटांची येथे निर्मिती होत नाही.(वृत्तसंस्था)सलमान खानची मध्यस्थीदिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांच्या आगामी चित्रपटात पाक कलावतं असल्याच्या कारणास्तव न मुंबई व महाराष्ट्रात प्रदर्शित न होउ देण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्यानंतर अभिनेता सलमान खान याने त्या वादात मध्यस्थी करण्याचे ठरविले आहे. सलमान खान स्वत: राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. मनसेने पाक कलावंतांवर बंदी घालण्याची घोषणा करण्याआधी आधी हा चित्रपट तयार झाला असल्याने तो प्रदर्शित होण्यात अडथळे आणू नये, अशी भूमिका तो मांडणार असल्याचे कळते.तो निर्णय केंद्र सरकारने घ्यावा - सैफ अली खानभारतीय चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार असावेत का किंवा पाकिस्तानी कलावंतांचे कार्यक्रम भारतात व्हावेत का, याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, असे अभिनेता सैफ अली खानने म्हटले आहे. सरकार जो निर्णय घेईल, तो सारेच मान्य करतील असे सांगून तो म्हणाला की, या प्रश्नाबाबत सतत उलटसुलट चर्चा होत असते. त्यावर एकच कायमस्वरूपी निर्णय सरकारने घेतल्यास वाद निर्माण हेणार नाहीत.