शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

पाकमधील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान

By admin | Updated: September 29, 2016 00:30 IST

रीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट

लाहोर : उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग ढोणी याच्या जीवनावरील शुक्रवारी प्रदर्शित होणारा चित्रपटही पाकिस्तानात न दाखविण्याचा निर्णय तेथील वितरकांनी घेतला आहे.चित्रपट व्यावसायिकांना अशी भीती आहे की, परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर भारतीय चित्रपटावर येथे बंदीची मागणी होऊ शकते. एक वितरक सिनेप्लेक्सचे मालक नदीम मंडविवल्ला यांनी सांगितले की, मी निराशावादी नाही; पण वस्तुस्थिती ही आहे की, गत काही वर्षांत हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित झाल्याने पाकिस्तानच्या चित्रपट व्यवसायाला एक उंची मिळाली आहे. मी एवढीच अपेक्षा करतो की, दीर्घ काळासाठी हा तणाव राहायला नको. काही काळापुरते प्रतिबंध लावले तर आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही; पण दीर्घ काळासाठी जर प्रतिबंध लावले, तर अनेक टॉकीज आणि मल्टीप्लेक्स बंद पडतील. चित्रपट समीक्षक उमर अलवी यांनी सांगितले की, सिनेमा टॉकीज आणि महसूल वाढल्याने पाकिस्तानातील चित्रपट उद्योगाने कात टाकली आहे. हा व्यवसाय चांगला चालण्यासाठी वर्षातून किमान ५० ते ६० चित्रपट तयार व्हायला हवेत; पण एवढ्या चित्रपटांची येथे निर्मिती होत नाही.(वृत्तसंस्था)सलमान खानची मध्यस्थीदिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांच्या आगामी चित्रपटात पाक कलावतं असल्याच्या कारणास्तव न मुंबई व महाराष्ट्रात प्रदर्शित न होउ देण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्यानंतर अभिनेता सलमान खान याने त्या वादात मध्यस्थी करण्याचे ठरविले आहे. सलमान खान स्वत: राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. मनसेने पाक कलावंतांवर बंदी घालण्याची घोषणा करण्याआधी आधी हा चित्रपट तयार झाला असल्याने तो प्रदर्शित होण्यात अडथळे आणू नये, अशी भूमिका तो मांडणार असल्याचे कळते.तो निर्णय केंद्र सरकारने घ्यावा - सैफ अली खानभारतीय चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार असावेत का किंवा पाकिस्तानी कलावंतांचे कार्यक्रम भारतात व्हावेत का, याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, असे अभिनेता सैफ अली खानने म्हटले आहे. सरकार जो निर्णय घेईल, तो सारेच मान्य करतील असे सांगून तो म्हणाला की, या प्रश्नाबाबत सतत उलटसुलट चर्चा होत असते. त्यावर एकच कायमस्वरूपी निर्णय सरकारने घेतल्यास वाद निर्माण हेणार नाहीत.