शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

प्रदूषणामुळे जगात दरवर्षी ३३ लाख नागरिकांचा मृत्यू

By admin | Updated: September 18, 2015 03:06 IST

झपाट्याने वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे जगात दरवर्षी ३३ लाख नागरिकांचा मृत्यू होतो. ही तर धोक्याची घंटा आहे. जर यावर नियंत्रण मिळविले नाही, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची

वॉशिंग्टन : झपाट्याने वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे जगात दरवर्षी ३३ लाख नागरिकांचा मृत्यू होतो. ही तर धोक्याची घंटा आहे. जर यावर नियंत्रण मिळविले नाही, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची ही संख्या दुप्पट होऊ शकते, असा इशारा अध्ययन करणाऱ्या वैज्ञानिकांनी दिला आहे.जर्मनी, सौदी अरेबिया आणि हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी हे निष्कर्ष काढले आहेत. प्रामुख्याने कृषी व औद्योगिकीकरण अधिक असलेल्या देशात धुरामुळे व कारखान्यातील वायू प्रदूषणामुळे हा धोका वाढत असल्याचे या अध्ययनात म्हटले आहे. वायू प्रदूषणावर जर नियंत्रण मिळविता आले नाही, तर २०५० पर्यंत वायू प्रदूषणाच्या बळींची संख्या दुप्पट होऊ शकते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्रीचे अभ्यासक जोस लिलायवेल्ड यांनी यासंदर्भातील एका पत्रिकेत प्रकाशित लेखात म्हटले आहे की, तीन महिन्यांत झालेले हृदयविकाराचे, स्ट्रोकचे मृत्यू याचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.युनिव्हर्सिटी आॅफ नॉर्थ कॅरोलिनाच्या पर्यावरण विभागाचे प्रोफेसर जेसन वेस्ट यांनी म्हटले आहे की, जगभरात विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यात सहा टक्के मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होतात, असे दिसून आले आहे. (वृत्तसंस्था)