शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

२०५० पर्यंत भारतात असतील जगात सर्वाधिक मुस्लिम

By admin | Updated: April 4, 2015 06:25 IST

२०५० पर्यंत जगात सर्वाधिक मुस्लिम भारतात असतील, याबाबतीत भारत इंडोनेशियालाही मागे टाकेल. त्याचवेळी हिंदू नागरिकांची संख्याही वाढेल व हिंदू

वॉशिंग्टन : २०५० पर्यंत जगात सर्वाधिक मुस्लिम भारतात असतील, याबाबतीत भारत इंडोनेशियालाही मागे टाकेल. त्याचवेळी हिंदू नागरिकांची संख्याही वाढेल व हिंदू नागरिक जगात तिसऱ्या क्रमांकावर येतील, असा नव्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. प्यू संशोधन संस्थेने जागतिक लोकसंख्येचा धर्मावर आधारित अभ्यास केला असून, त्याचे हे निष्कर्ष आहेत. हिंदू व ख्रिश्चन नागरिकांची लोकसंख्या जागतिक लोकसंख्या वाढीच्या वेगाबरोबर असणार आहे; पण मुस्लिम लोकसंख्या मात्र जागतिक लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त गतीने वाढणार आहे. हिंदू बहुसंख्य राहतीलच भारतात हिंदू नागरिक हे बहुसंख्य राहतील; पण मुस्लिम नागरिकांची संख्याही वाढेल व जगात सर्वाधिक मुस्लिम नागरिक राहणारा देश भारत ठरेल. यासंदर्भात भारत इंडोनेशियालाही मागे टाकेल, असे प्यू अहवाल म्हणतो. प्यू अहवालानुसार २०११ साली इंंडोनेशियात मुस्लिम लोकसंख्या २०५ दशलक्ष इतकी होती. त्यावेळी भारतात १७७ दशलक्ष मुस्लिम होते. येत्या चार दशकांत ख्रिश्चन हा सर्वांत मोठा धार्मिक गट राहील; पण इस्लामची वाढ कोणत्याही धर्मापेक्षा जास्त असेल. २०५० सालापर्यंत मुस्लिम नागरिकांची संख्या २.८ अब्ज असेल. म्हणजेच मुस्लिम लोकसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ होईल. त्याचवेळी ख्रिश्चन नागरिकांची संख्या २.९ अब्ज असेल व वाढ होण्याची गती ३१ टक्के असेल. ( मानव जातीच्या इतिहासात प्रथमच) जगातिक पातळीवर ख्रिश्चन व मुस्लिम यांची संख्या जवळपास समान असेल. २०१० साली जगात मुस्लिम १.६ अब्ज होते व ख्रिश्चन २.१७ अब्ज होते. लोकसंख्या वाढीचा हाच वेग कायम राहिल्यास २०७० साली इस्लाम हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय असा धर्म असेल. २०५० साली युरोपमधील लोकसंख्येच्या १० टक्के मुस्लिम असतील. बौद्ध नागरिकांची संख्या कायम बौद्ध धर्म हा जगातील एकच असा धर्म आहे की, पालन करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता नाही. बौद्ध धर्म, भारत, चीन, जपान, थायलंडमध्ये पाळला जातो. या देशातील प्रजनन दर स्थिर असल्याने या धर्माचे नागरिक वाढण्याची शक्यता नाही. (वृत्तसंस्था)