शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

२०५० पर्यंत भारतात असतील जगात सर्वाधिक मुस्लिम

By admin | Updated: April 4, 2015 06:25 IST

२०५० पर्यंत जगात सर्वाधिक मुस्लिम भारतात असतील, याबाबतीत भारत इंडोनेशियालाही मागे टाकेल. त्याचवेळी हिंदू नागरिकांची संख्याही वाढेल व हिंदू

वॉशिंग्टन : २०५० पर्यंत जगात सर्वाधिक मुस्लिम भारतात असतील, याबाबतीत भारत इंडोनेशियालाही मागे टाकेल. त्याचवेळी हिंदू नागरिकांची संख्याही वाढेल व हिंदू नागरिक जगात तिसऱ्या क्रमांकावर येतील, असा नव्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. प्यू संशोधन संस्थेने जागतिक लोकसंख्येचा धर्मावर आधारित अभ्यास केला असून, त्याचे हे निष्कर्ष आहेत. हिंदू व ख्रिश्चन नागरिकांची लोकसंख्या जागतिक लोकसंख्या वाढीच्या वेगाबरोबर असणार आहे; पण मुस्लिम लोकसंख्या मात्र जागतिक लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त गतीने वाढणार आहे. हिंदू बहुसंख्य राहतीलच भारतात हिंदू नागरिक हे बहुसंख्य राहतील; पण मुस्लिम नागरिकांची संख्याही वाढेल व जगात सर्वाधिक मुस्लिम नागरिक राहणारा देश भारत ठरेल. यासंदर्भात भारत इंडोनेशियालाही मागे टाकेल, असे प्यू अहवाल म्हणतो. प्यू अहवालानुसार २०११ साली इंंडोनेशियात मुस्लिम लोकसंख्या २०५ दशलक्ष इतकी होती. त्यावेळी भारतात १७७ दशलक्ष मुस्लिम होते. येत्या चार दशकांत ख्रिश्चन हा सर्वांत मोठा धार्मिक गट राहील; पण इस्लामची वाढ कोणत्याही धर्मापेक्षा जास्त असेल. २०५० सालापर्यंत मुस्लिम नागरिकांची संख्या २.८ अब्ज असेल. म्हणजेच मुस्लिम लोकसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ होईल. त्याचवेळी ख्रिश्चन नागरिकांची संख्या २.९ अब्ज असेल व वाढ होण्याची गती ३१ टक्के असेल. ( मानव जातीच्या इतिहासात प्रथमच) जगातिक पातळीवर ख्रिश्चन व मुस्लिम यांची संख्या जवळपास समान असेल. २०१० साली जगात मुस्लिम १.६ अब्ज होते व ख्रिश्चन २.१७ अब्ज होते. लोकसंख्या वाढीचा हाच वेग कायम राहिल्यास २०७० साली इस्लाम हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय असा धर्म असेल. २०५० साली युरोपमधील लोकसंख्येच्या १० टक्के मुस्लिम असतील. बौद्ध नागरिकांची संख्या कायम बौद्ध धर्म हा जगातील एकच असा धर्म आहे की, पालन करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता नाही. बौद्ध धर्म, भारत, चीन, जपान, थायलंडमध्ये पाळला जातो. या देशातील प्रजनन दर स्थिर असल्याने या धर्माचे नागरिक वाढण्याची शक्यता नाही. (वृत्तसंस्था)