शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जिल्हा परिषदेतील धुसफूस; अधिकाऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

हिंगोली जिल्हा परिषदेत आतापर्यंत विरोधक असले तरीही त्यांना पक्षभेदानंतरही तशी वागणूक कधी मिळायची नाही. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीच परंपरा ...

हिंगोली जिल्हा परिषदेत आतापर्यंत विरोधक असले तरीही त्यांना पक्षभेदानंतरही तशी वागणूक कधी मिळायची नाही. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीच परंपरा राहिली आहे. इतर काही जिल्ह्यांतील चित्र पाहता हिंगोलीत असलेली ही पद्धत विकासकामांच्या नियोजनासाठी अतिशय पोषक असायची. त्याचबरोबर प्रत्येक बाबीमध्ये सदस्यांची असलेली एकजूट अधिकाऱ्यांवरही दबाव निर्माण करणारी असायची. सभागृहाच्या या एकजुटीपुढे कुणालाच लहरी कारभाराची संधी मिळायची नाही.

शिक्षण व अर्थ सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावरील अविश्वासानंतर मात्र वातावरण बदलले आहे. अविश्वासाला समर्थन न देणारे आता अजेंड्यावर आले आहेत. त्यांना आगामी काळात अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. मात्र सदस्यांच्या या एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या दृष्टिकोनात अधिकाऱ्यांना आपण भरडले जाईल, याची भीती वाटत आहे. त्यातच काही विभागांचा आधीच ढेपाळलेला कारभार यामुळे चव्हाट्यावर येण्याचीही भीती आहे. सत्ताधारी कितीही सावरून नेण्याचा प्रयत्न करणारे असले तरीही विरोधकही तेवढेच आक्रमक आहेत. मात्र काही विभागाचे अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशांना पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत पाठीशी घातले. मात्र किती काळ ते निभावून नेतील, हा प्रश्न आहे. बांधकाम विभाग निशान्यावर असून या विभागाचीही भंबेरी उडाल्याचे दिसत आहे. या अधिकाऱ्यांना फक्त पदाधिकारीच वाचवू शकतील, असे दिसत आहे.