शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

वायचाळ पिंंपरी प्रकरणातील गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

हिंगोली : वायचाळ पिंपरी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...

हिंगोली : वायचाळ पिंपरी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

९ फेब्रुवारी रोजी सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया ८ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमन सातकर यांना तिच्या नातेवाईक मंडळींनी बिनविरोध निवडून आणले होते. यानंतर सदरील महिलेस विरोधी लोकांनी गायब करुन अज्ञात स्थळी ठेवले होते. या महिलेचा शोध तिच्या नाईवाईकांस तिची मुलगी सुद्धा करीत होती. यानंतर सुमन सातकर यांचा शोध लागल्यानंतर सुमन यांना चक्कर आली व त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. चक्कर येवून पडल्यामुळे सुमन सातकर यांना मार लागला. पण या महिलेने राजकीय सुडापोटी ज्या महिलांचा संबंध नाही. त्या महिलांचे नाव सुद्धा गुन्ह्यात सांगितले आहे. या सर्व महिलांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहे. यामुळे गावातील शांतता भंग झाली असून ज्या महिलांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहे. या प्ररकणातील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षकांकडे वायचाळ पिंपरी ग्रामस्थांनी केली आहे.

या निवेदनावर बापुराव सोळंके, विश्वास सोळंके, ज्ञानेश्वर देवकर, अमोल देवकर, अरुण देवकर, अनिल देवकर, गंगाराम मुधोळकर, पंडीत देवकर, अरुण सोळंके, संतोष सोळंके, मारोती देवकर, सुरेश देवकर, विष्णु भगत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.