शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST

हिंगोली : शहरातील मोक्याच्या ठिकाणी जी काही होर्डिंग्ज लावलेली दिसत आहेत ती अनधिकृत नाहीत. त्यांच्याकडून १० रुपये फुटांप्रमाणे दिवसाला ...

हिंगोली : शहरातील मोक्याच्या ठिकाणी जी काही होर्डिंग्ज लावलेली दिसत आहेत ती अनधिकृत नाहीत. त्यांच्याकडून १० रुपये फुटांप्रमाणे दिवसाला कर वसूल केला जातो, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, नांदेड नाका अशा चार ते पाच ठिकाणी जवळपास ४२ जणांनी होर्डिंग्ज लावले आहेत. त्यांच्याकडून १० रुपये फुटांप्रमाणे दिवसाला कर वसूल केला जातो. ज्यांच्या होर्डिंग्जची तारीख संपलेली आहे, अशांना दहा दिवस आधी होर्डिंग्ज काढण्याची सूचना दिली जाते. सूचना देऊनही त्यांनी काढले नाही तर दोन रुपयांप्रमाणे दिवसाला त्यांना दंडही आकारला जातो. शहराचे विद्रुपीकरण होणार नाही याची पुरेपूर काळजी नगर परिषदेच्या वतीने घेतली जाते.

या ठिकाणांकडे लक्ष कोण देणार?

शहरातील नांदेडनाका ते गांधी चौकापर्यंत अनेक होर्डिंग्ज लावले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष त्याकडे जात आहे. कित्येक वेळा त्याकडे पाहत किरकोळ अपघातही होत आहेत. अशावेळी यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

वर्षभरापासून कारवाई नाही....

गत दीड वर्षापासून कोरोना महामारी होती. त्यामुळे कोणीच होर्डिंग्ज लावलेले नव्हते. काही मोजकेच होर्डिंग्ज त्या काळात होते; पण त्यांनीही परवानगी घेतलेली होती. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. कर विभागाने वेळोवेळी अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली आहे.

काय होऊ शकते कारवाई?

होर्डिंग्जची मुदत संपलेली असेल तर त्यांना आधी सूचना दिली जाते. सांगूनही त्यांनी ऐकले नाही तर २ रुपये फुटांप्रमाणे दिवसाला कर लावत त्या होर्डिंग्ज मालकावर कारवाई केली जाते.

प्रतिक्रिया...

मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना विचारल्याशिवाय कोणतेही होर्डिंग्ज शहरात लावले जात नाहीत. शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता प्रथम घेतली जाते.

-उमेश हेंबाडे, कर निरीक्षक तथा उपमुख्याधिकारी

नागरिक काय म्हणतात...

शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत; पण हे होर्डिंग्ज अधिकृत आहेत की अनधिकृत हे काही कळायला मार्ग नाही. मुदत संपलेली असेल तर ते लवकरात लवकर काढायला पाहिजे.

मुरली कल्याणकर, नागरिक

खरे पाहिले तर वाढदिवस, शुभेच्छा असे होर्डिंग्ज शहरात लावूच नयेत. अशा प्रकारामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. नगरपालिकेने ते तातडीने काढून टाकायला पाहिजे; पण नगरपालिका का काढत नाही, नगरपालिकेने यासाठी जागा ठरवून द्यायला पाहिजे.

- महेश राखोंडे, नागरिक