शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
3
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
6
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
7
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
8
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
9
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
10
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
11
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
12
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
13
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
14
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
15
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
16
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
17
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
18
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
20
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST

हिंगोली : शहरातील मोक्याच्या ठिकाणी जी काही होर्डिंग्ज लावलेली दिसत आहेत ती अनधिकृत नाहीत. त्यांच्याकडून १० रुपये फुटांप्रमाणे दिवसाला ...

हिंगोली : शहरातील मोक्याच्या ठिकाणी जी काही होर्डिंग्ज लावलेली दिसत आहेत ती अनधिकृत नाहीत. त्यांच्याकडून १० रुपये फुटांप्रमाणे दिवसाला कर वसूल केला जातो, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, नांदेड नाका अशा चार ते पाच ठिकाणी जवळपास ४२ जणांनी होर्डिंग्ज लावले आहेत. त्यांच्याकडून १० रुपये फुटांप्रमाणे दिवसाला कर वसूल केला जातो. ज्यांच्या होर्डिंग्जची तारीख संपलेली आहे, अशांना दहा दिवस आधी होर्डिंग्ज काढण्याची सूचना दिली जाते. सूचना देऊनही त्यांनी काढले नाही तर दोन रुपयांप्रमाणे दिवसाला त्यांना दंडही आकारला जातो. शहराचे विद्रुपीकरण होणार नाही याची पुरेपूर काळजी नगर परिषदेच्या वतीने घेतली जाते.

या ठिकाणांकडे लक्ष कोण देणार?

शहरातील नांदेडनाका ते गांधी चौकापर्यंत अनेक होर्डिंग्ज लावले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष त्याकडे जात आहे. कित्येक वेळा त्याकडे पाहत किरकोळ अपघातही होत आहेत. अशावेळी यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

वर्षभरापासून कारवाई नाही....

गत दीड वर्षापासून कोरोना महामारी होती. त्यामुळे कोणीच होर्डिंग्ज लावलेले नव्हते. काही मोजकेच होर्डिंग्ज त्या काळात होते; पण त्यांनीही परवानगी घेतलेली होती. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. कर विभागाने वेळोवेळी अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली आहे.

काय होऊ शकते कारवाई?

होर्डिंग्जची मुदत संपलेली असेल तर त्यांना आधी सूचना दिली जाते. सांगूनही त्यांनी ऐकले नाही तर २ रुपये फुटांप्रमाणे दिवसाला कर लावत त्या होर्डिंग्ज मालकावर कारवाई केली जाते.

प्रतिक्रिया...

मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना विचारल्याशिवाय कोणतेही होर्डिंग्ज शहरात लावले जात नाहीत. शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता प्रथम घेतली जाते.

-उमेश हेंबाडे, कर निरीक्षक तथा उपमुख्याधिकारी

नागरिक काय म्हणतात...

शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत; पण हे होर्डिंग्ज अधिकृत आहेत की अनधिकृत हे काही कळायला मार्ग नाही. मुदत संपलेली असेल तर ते लवकरात लवकर काढायला पाहिजे.

मुरली कल्याणकर, नागरिक

खरे पाहिले तर वाढदिवस, शुभेच्छा असे होर्डिंग्ज शहरात लावूच नयेत. अशा प्रकारामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. नगरपालिकेने ते तातडीने काढून टाकायला पाहिजे; पण नगरपालिका का काढत नाही, नगरपालिकेने यासाठी जागा ठरवून द्यायला पाहिजे.

- महेश राखोंडे, नागरिक