शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

डेमो रेल्वे सुरु करण्याचे काय झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

हिंगोली: प्रवाशांच्या सोयीकरीता पूर्णा ते अकोट ही डेमो रेल्वे सुरु करण्याचा रेल्वे विभागाचा माणस आहे. परंतु, रेल्वे विभागाने अद्यापपर्यत ...

हिंगोली: प्रवाशांच्या सोयीकरीता पूर्णा ते अकोट ही डेमो रेल्वे सुरु करण्याचा रेल्वे विभागाचा माणस आहे. परंतु, रेल्वे विभागाने अद्यापपर्यत तरी याकडे लक्ष वेधलेले दिसत नाही. ‘डेमो’ बाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांची आहे.

कोरोना महामारी ओसरत चालली असल्यामुळे प्रवाशी संख्या वाढल्याचे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे. कोरोना महामारीच्या काळात २० ते २५ प्रवासी हे प्रवास करायचे. परंतु, आजमितीस १५० ते २०० प्रवासी प्रवास करु लागले आहेत.सद्य:स्थितीत अकोला ते पूर्णा, अमरावती ते पुणे, अजनी ते मुंबई या रेल्वे गाड्या बंद आहेत. रेल्वे विभागाची सूचना येईल त्या पद्धतीने या रेल्वे सुरु गाड्या सुरु केल्या जातील, असे स्टेशनमास्टर रामसिंग मीना यांनी सांगितले.

जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे

नरखेड ते काचीगुडा

जम्मूतावी ते नांदेड

जयपूर ते हैदराबाद

तिकिटात फरक किती

साधे तिकीट देणे सध्या तरी सुरु आहे. आजमितीस एक्सप्रेस रेल्वेच सुरु आहेत. केंद्र शासन व रेल्वे विभागाची सूचना आल्यास साधे तिकीट देता येईल. सध्या आरक्षण तिकीटच दिले जात आहे. आरक्षण तिकीटात सोयी-सुविधा मिळतात. साध्या तिकीटात त्या मिळत नाहीत.

साधे तिकीट अजून तरी सुरु नाही...

पॅसेंजर गाड्या सुरु नसल्यामुळे साधे तिकीट सध्या सुरु नाही. एक्सप्रेसला गाडीने प्रवास करायचा झाल्यास आजमितीस आरक्षण करणे आवश्यक आहे. कोरोना महामारी अजून संपलेली नाही, त्यामुळे मास्क घालणे आवश्यक आहे. रेल्वे विभागाच्या जशा सूचना येतील त्या प्रमाणे प्रवाशांना सोयी दिल्या जातील, असे रेल्वे विभागाने सूचित केले.

प्रवाशी काय म्हणतात....

पॅसेंजर गाड्या सुरु नसल्यामुळे नाईलाजास्तव एक्सप्रेसचे तिकीट काढावे लागत आहे. यामुळे खर्चात जास्त वाढ होत आहे. रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे सुरु करणे गरजेचे आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

पूर्वी सुरु असलेली पूर्णा-अकोट ही पॅसेंजर सध्या सुरु नाही. त्यामुळे प्रवाशाना अतोनात त्रास होत आहे. शहराच्या ठिकाणी जायचे झाल्यास अवैध वाहतुकीचा साहरा घ्यावा लागत आहे. कधी-कधी दोन-दोन तास थांबावे लागत आहे, अशी कैफियत प्रवाशांनी मांडली.