शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

१३ गावांत पाणीटंचाईची चाहूल; उन्हाची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

येथील पंचायत समितीने जानेवारी ते जूनपर्यंतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. तो जिल्हा प्रशासनाने मंजूरही केला आहे. ...

येथील पंचायत समितीने जानेवारी ते जूनपर्यंतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. तो जिल्हा प्रशासनाने मंजूरही केला आहे. हा आराखडा ३ कोटी १३ लाख ६० हजारांचा आहे. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणीही होणे गरजेेचे आहे. पुढील आठवड्यात बिबगव्हाण, महालिंगी तांडा, पानबुडी वस्ती, माळधावंडा, रामवाडी, हातमाली, जांब, नरवाडी, गोटेवाडी, गागापूर, हरवाडी, खरवड आदी गावांत पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

जानेवारी ते मार्चपर्यंतचा पाणीटंचाई आराखडा २ कोटी ४८ लाख ८ हजारांचा असून, एप्रिल ते जूनदरम्यानचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा ६५ लाख ५२ हजारांचा आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान तात्पुरती पूरक नळयोजना २३ गावांत तयार करण्यासाठी १ कोटी ३३ लाख ८० हजार, नळ योजना विशेष दुरुस्तीसाठी पंचवीस लाख, नळ योजना विशेष दुरुस्ती दोन गावांत केली जाणार आहे. त्यात मोरवाडी प्रादेशिक २५ गाव पाणीपुरवठा योजना व पोतरा येथील गावातही नळ योजना विशेष दुरुस्ती केल्या जाणार आहे.

१२५ गावांत १४४ नवीन विंधन विहीर घेण्यासाठी ८९ लाख २८ हजारांचा आराखडा तयार आहे. एप्रिल ते जूनदरम्यान ७६ गावांत ९८ विहीर व बोअरच्या अधिग्रहणासाठी ५२ लाख ९२ हजार, तसेच बीबगव्हाण, महालिंगी तांडा, पाणबुडी वस्ती, माळधावंडा, रामवाडी, हातमाली या ६ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १२ लाख ६ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात काही गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

तालुक्यात १,१७० हातपंप असून, दुरुस्ती अभावी ३५ ते ४० हातपंप बंद आहेत. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, दुपारच्या वेळेला कडक ऊन जाणवत आहे. उपलब्ध जलस्रोत आटत चालले आहेत. मागील दोन वर्षांपासून अतिवृष्टी होत असल्याने तालुक्यातील भूजलाची पातळी वाढलेली आहे. दुसरीकडे मागील दोन वर्षांपासून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत काही गावांत जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली असल्यामुळे तेथील भूजल पातळी वाढलेली आहे.

सध्या कडक उन्हाळा जाणवत असून, उपलब्ध जलस्रोत आटत चालले आहेत. हातपंपाच्या पाण्याची पातळीही खालावल्या जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई बहुतांश गावात जाणवू लागली आहे. काही गावांतील ग्रामस्थ शेतातील विहिरीतून पाणी आणत आहेत. आतापर्यंत पंचायत समितीकडे एकाही गावाने अधिग्रहण व टँकरचा प्रस्ताव दिलेला नाही, परंतु येत्या आठवड्यात पाणीटंचाईबाबतचे अहवाल येणार असल्याची शक्यता आहे. पंचायत समिती स्तरावर पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठ्याचे केशव सावंत यांनी दिली.

आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

गावात पाणीटंचाई भासत असल्यास, ग्रामपंचायतीने तसा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मागील दोन वर्षांपासून तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे भूजल पातळी वाढलेली आहे. येत्या एप्रिल महिन्यात अनेक गावात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी संभाव्य पाणीटंचाई आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. येत्या एप्रिल व मे महिन्यात तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.