शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

आधीच्या ५० हजारांनाच लसीकरण; आता अठरा वर्षांवरील ५.२६ लाख जणांची नवी भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

फक्त तीन दिवस पुरेल एवढा साठा सध्या जिल्हा प्रशासनाकडे फक्त तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा आहे. शहरातील केंद्र ...

फक्त तीन दिवस पुरेल एवढा साठा

सध्या जिल्हा प्रशासनाकडे फक्त तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा आहे. शहरातील केंद्र दोन दिवस बंद होते. ३१४० लस उपलब्ध झाल्यानंतर ते सुरू झाले. सध्याची गती पाहता हा साठा तीन दिवसांपेक्षा जास्त पुरणार नाही. लगेच आला तर केंद्र बंद ठेवायची गरज पडणार नाही.

४५ पेक्षा जास्त वयाचे ५ टक्केच लसीकरण

४५ पेक्षा जास्त व ६० पेक्षा कमी वयाचे २.१५ लाख नागरिक आहेत. त्यांच्यापैकी ११ हजार ४६६ जणांनाच आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस दिली, तर १०७० जणांनी दुसरा डोस घेतला. हे प्रमाण ५ टक्केच असून, याचा वेग कधी वाढणार हा प्रश्न आहे.

२५ टक्के ज्येष्ठांचे लसीकरण

ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास दीड लाखांच्या घरात आहे. त्यापैकी २३ हजार ६४५ जणांनी लसीकरण केले, तर १६७९ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. अजूनही ज्येष्ठच यात पुढे आहेत.

दिलेल्या वेळ मर्यादेनुसार दुसरा डोस

पहिला डोस घेतल्यानंतर त्याच लसीचा दुसरा डोस दीड महिन्यानंतर घ्यावयाचा आहे. पहिली लस घेतल्यानंतर एवढा काळ संपला की, दुसरी लस घेण्यासाठी नागरिक येत आहेत. त्यानुसार त्यांना ही लस दिली जात आहे.

दुसरी लस घेणाऱ्यांमध्ये ३७९६ आरोग्य कर्मचारी, १३४४ फ्रंटलाइन वर्कर, १०७० जण ४५ वर्षांपुढील तर १६७९ ज्येष्ठांचा समावेश आहे. अनेकांनी लस घेण्यास विलंब केल्याने या महिन्याच्या शेवटी व पुढील महिन्यात दुसऱ्या डोसची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

ही गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाला आता नियोजन करावे लागणार असून, अशांसाठी डोसही राखीव ठेवत नवीन लसीकरण करावे लागणार आहे; अन्यथा विलंबाचा फटकाही सोसावा लागू शकतो.

लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज

सध्या जिल्ह्यात ३० शासकीय व ३ खासगी केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. यात आता वाढ करणे गरजेचे आहे. १ मेपासून १८ वर्षांपुढील गट आल्यानंतर जेथे तीन खोल्या व इंटरनेटची व्यवस्था आहे, अशा प्रत्येक गावात लसीकरणास प्रारंभ करावा लागेल. सध्या काही उपकेंद्र स्तरावर मिळून ५५ केंद्रांचे नियोजन करून काम सुरू आहे. मात्र, यापेक्षा जास्त केंद्र स्थापन केल्याशिवाय लसीकरणाला गती येणार नाही.

१४,१२,४५० जिल्ह्याची लोकसंख्या

१८ ते ४५ वर्षांपर्यंतची लोकसंख्या ५,२६,१७१

स्त्री संख्या २,३८,०९७

पुरुष संख्या २,८८,०७४