शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
6
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
7
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
8
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
9
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
10
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
11
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
12
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
13
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
14
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
15
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
16
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
17
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
18
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
19
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
20
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसानंतर लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शन नंतर कोरोना लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले होते. तीन दिवसानंतर लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण ...

हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शन नंतर कोरोना लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले होते. तीन दिवसानंतर लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले. मंगळवारी कोव्हॅक्सिन लस आली होती. कोविशिल्ड काही दिवसातच येणार असल्याचे केंद्राच्या ठिकाणावरून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील ३३ केंद्रावर लस देण्याचे सुरु होते. परंतु, लस अचानक संपल्यामुळे नागरिकांना तीन दिवस लस घेण्यासाठी थांबावे लागले होते. आतापर्यंत कोविशिल्डचे ५० हजार तर कोव्हॅक्सिनचे १२ हजार ९२० डोस देण्यात आलेले आहेत. लसीचा साठा संपल्यामुळे शहरातील कल्याण मंडपम येथील केंद्र बंद पडले होते. लस संपल्याचे फलक ही तेथे लावण्यात आला होता. संचारबंदीत ही काही नागरिक लसीकरण केंद्रावर येऊन जात होते. पण फलकावरून सूचना वाचून निराश होऊन परत जाताना पहायला मिळाले.

१७ व १८ एप्रिल रोजी काही नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात विचारणा केली. तेव्हा त्यांना १९ एप्रिल रोजी लस येणार असे सांगितले गेले. पण सोमवारी ही लस आली नव्हती. त्यामुळे नागरिकांची विनाकारण चक्कर झाली. खासगी दवाखान्यात तरी लस मिळेल या आशेने काहींनी विचारणा केली. पण तिथेही लस नाही, असे सांगितले.

लसीकरण केंद्र बदलल्याचे माहितीच नाही

अँटीजन, आरटीपीसीआर आणि लसीकरण हे सुरूवातीपासूनच एकाच छताखाली सुरू होते. ‘लसीकरण आणि कोरोना तपासणी एकाच छताखाली ’ अशी बातमी ‘लोकमत’ मध्ये आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची जागा बदलली. परंतु अजूनही शहरातील नागरिकांना त्याची माहिती नाही. आजही काही नागरिक जिल्हा सामान्य रूग्णालयातील डीईआयसी विभागाकडे जात आहेत. नंतर कल्याण मंडपम येथे येत आहेत.

लसीकरण केंद्रावर पाण्याची सोय नाही

पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. प्रखर उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. हे माहिती असूनही जिल्हा रूग्णालयाच्या वतीने साधी पाण्याची सोयही केली नाही. काही नागरिक पिण्याची विचारणा करीत आहेत. यानंतर येथील कर्मचारी पाण्याची व्यवस्था केली जाईल, असे म्हणून वेळ निभावून नेत आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरणाच्या ठिकाणी पाण्याची सोय नाही हे पाहून काहींजण घरूनच पाणी घेऊन येत आहेत.