शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

तीन दिवसानंतर लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शन नंतर कोरोना लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले होते. तीन दिवसानंतर लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण ...

हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शन नंतर कोरोना लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले होते. तीन दिवसानंतर लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले. मंगळवारी कोव्हॅक्सिन लस आली होती. कोविशिल्ड काही दिवसातच येणार असल्याचे केंद्राच्या ठिकाणावरून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील ३३ केंद्रावर लस देण्याचे सुरु होते. परंतु, लस अचानक संपल्यामुळे नागरिकांना तीन दिवस लस घेण्यासाठी थांबावे लागले होते. आतापर्यंत कोविशिल्डचे ५० हजार तर कोव्हॅक्सिनचे १२ हजार ९२० डोस देण्यात आलेले आहेत. लसीचा साठा संपल्यामुळे शहरातील कल्याण मंडपम येथील केंद्र बंद पडले होते. लस संपल्याचे फलक ही तेथे लावण्यात आला होता. संचारबंदीत ही काही नागरिक लसीकरण केंद्रावर येऊन जात होते. पण फलकावरून सूचना वाचून निराश होऊन परत जाताना पहायला मिळाले.

१७ व १८ एप्रिल रोजी काही नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात विचारणा केली. तेव्हा त्यांना १९ एप्रिल रोजी लस येणार असे सांगितले गेले. पण सोमवारी ही लस आली नव्हती. त्यामुळे नागरिकांची विनाकारण चक्कर झाली. खासगी दवाखान्यात तरी लस मिळेल या आशेने काहींनी विचारणा केली. पण तिथेही लस नाही, असे सांगितले.

लसीकरण केंद्र बदलल्याचे माहितीच नाही

अँटीजन, आरटीपीसीआर आणि लसीकरण हे सुरूवातीपासूनच एकाच छताखाली सुरू होते. ‘लसीकरण आणि कोरोना तपासणी एकाच छताखाली ’ अशी बातमी ‘लोकमत’ मध्ये आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची जागा बदलली. परंतु अजूनही शहरातील नागरिकांना त्याची माहिती नाही. आजही काही नागरिक जिल्हा सामान्य रूग्णालयातील डीईआयसी विभागाकडे जात आहेत. नंतर कल्याण मंडपम येथे येत आहेत.

लसीकरण केंद्रावर पाण्याची सोय नाही

पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. प्रखर उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. हे माहिती असूनही जिल्हा रूग्णालयाच्या वतीने साधी पाण्याची सोयही केली नाही. काही नागरिक पिण्याची विचारणा करीत आहेत. यानंतर येथील कर्मचारी पाण्याची व्यवस्था केली जाईल, असे म्हणून वेळ निभावून नेत आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरणाच्या ठिकाणी पाण्याची सोय नाही हे पाहून काहींजण घरूनच पाणी घेऊन येत आहेत.