शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

तीन दिवसानंतर लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शन नंतर कोरोना लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले होते. तीन दिवसानंतर लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण ...

हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शन नंतर कोरोना लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले होते. तीन दिवसानंतर लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले. मंगळवारी कोव्हॅक्सिन लस आली होती. कोविशिल्ड काही दिवसातच येणार असल्याचे केंद्राच्या ठिकाणावरून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील ३३ केंद्रावर लस देण्याचे सुरु होते. परंतु, लस अचानक संपल्यामुळे नागरिकांना तीन दिवस लस घेण्यासाठी थांबावे लागले होते. आतापर्यंत कोविशिल्डचे ५० हजार तर कोव्हॅक्सिनचे १२ हजार ९२० डोस देण्यात आलेले आहेत. लसीचा साठा संपल्यामुळे शहरातील कल्याण मंडपम येथील केंद्र बंद पडले होते. लस संपल्याचे फलक ही तेथे लावण्यात आला होता. संचारबंदीत ही काही नागरिक लसीकरण केंद्रावर येऊन जात होते. पण फलकावरून सूचना वाचून निराश होऊन परत जाताना पहायला मिळाले.

१७ व १८ एप्रिल रोजी काही नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात विचारणा केली. तेव्हा त्यांना १९ एप्रिल रोजी लस येणार असे सांगितले गेले. पण सोमवारी ही लस आली नव्हती. त्यामुळे नागरिकांची विनाकारण चक्कर झाली. खासगी दवाखान्यात तरी लस मिळेल या आशेने काहींनी विचारणा केली. पण तिथेही लस नाही, असे सांगितले.

लसीकरण केंद्र बदलल्याचे माहितीच नाही

अँटीजन, आरटीपीसीआर आणि लसीकरण हे सुरूवातीपासूनच एकाच छताखाली सुरू होते. ‘लसीकरण आणि कोरोना तपासणी एकाच छताखाली ’ अशी बातमी ‘लोकमत’ मध्ये आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची जागा बदलली. परंतु अजूनही शहरातील नागरिकांना त्याची माहिती नाही. आजही काही नागरिक जिल्हा सामान्य रूग्णालयातील डीईआयसी विभागाकडे जात आहेत. नंतर कल्याण मंडपम येथे येत आहेत.

लसीकरण केंद्रावर पाण्याची सोय नाही

पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. प्रखर उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. हे माहिती असूनही जिल्हा रूग्णालयाच्या वतीने साधी पाण्याची सोयही केली नाही. काही नागरिक पिण्याची विचारणा करीत आहेत. यानंतर येथील कर्मचारी पाण्याची व्यवस्था केली जाईल, असे म्हणून वेळ निभावून नेत आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरणाच्या ठिकाणी पाण्याची सोय नाही हे पाहून काहींजण घरूनच पाणी घेऊन येत आहेत.