शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:27 IST

पोलीस गस्तीची गरज हिंगोली : शहरातील पोस्ट ऑफिस रोड ते रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काही टवाळखोर आपल्या वाहनांचा मोठा आवाज ...

पोलीस गस्तीची गरज

हिंगोली : शहरातील पोस्ट ऑफिस रोड ते रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काही टवाळखोर आपल्या वाहनांचा मोठा आवाज करीत नागरिकांना विनाकारण त्रास देत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर अनेक रुग्णालय असून या प्रकाराचा त्रास रुग्णांना होत आहे. वारंवार या टवाळखोरांना नागरिकांनी समज दिल्यानंतरही त्यांचा प्रकार कमी होत नाही. यामुळे रात्री साडेआठ ते दहाच्या सुमारास या रस्त्यावर पोलिसांची गस्ती रहावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मास्कचा वापर वाढला

हिंगोली : मागील चार दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर मास्कचा वापर करीत आहेत. गेल्या काही महिन्यांत नागरिकांत कोरोनाची भीती कमी झाली होती. यामुळे अनेक नागरिकांनी मास्कचा वापर करण्यास टाळाटाळ केली, पण चार दिवसांपासून हिंगोली शहरात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला असल्याचे पाहत नागरिकांनी मास्कचा वापर करणे पुन्हा सुरू केले आहे.

दुष्काळी अनुदान व पीकविम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

सेनगाव : तालुक्यातील अनेक शेतकरी दुष्काळी अनुदान व पीकविम्यापासून वंचित राहिला आहे. आपला पीकविमा मंजूर झाला का, हे पाहण्यासाठी तालुक्यातील शेतकरी बँकेत जावून आपले बँकखाते तपासत असल्याचे दिसत आहे. वारंवार मागणी करूनही अनेक शेतकऱ्यांना पीकविमा व दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. यामुळे पुढील शेतीकामांसाठी पैसे कोठून आणावे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

मजुरांचे स्थलांतर वाढले

औंढा नागनाथ : तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गतचे काम बंद असल्यामुळे अनेक मजूर वर्ग कामाच्या शोधात भटकंती करीत आहे. तालुक्यात काम मिळत नसल्यामुळे बरेच मजूर आपल्या कुटुंबांसह परगावी कामाच्या शोधात जात आहेत. शहरातील राज्यमहामार्गावर अनेक मजुरांचा ताफा ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी आदी वाहनांतून औरंगाबाद, मुंबई, पनवेल, कल्याण, ठाणे, सुरत, इंदौर व इतर मोठ्या शहरांच्या ठिकाणी जात असल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज

हिंगोली : शहरातील जुन्या शासकीय रुग्णालय परिसरात कचऱ्याचा मोठा ढिगारा जमा झाला आहे. अनेक दिवसांपासून याठिकाणी कचरा जमा झाल्यामुळे दुर्गंधी परिसरात पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. मागील अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांकडून हा कचरा साफ करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. यासाठी न.प. विभागाने याकडे लक्ष घालून हा कचरा साफ करेल, अशी आशा या नागरिकांना लागली आहे.