शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

दुष्काळी छायेने घेतले दोन बळी

By admin | Updated: August 13, 2014 00:24 IST

सेनगाव : तालुक्यातील चिखलागर तांडा येथे गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

सेनगाव : तालुक्यातील चिखलागर तांडा येथे गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर्षीची दुष्काळी स्थिती व कर्जाचा डोंगर या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.या लहानशा तांड्यावर कुणीही फारसा श्रीमंत शेतकरी नाही. अनेकांची बेताचीच परिस्थिती. आत्महत्याग्रस्त शेतकरीही याच पठडीतले. त्यामुळे त्यांना दुष्काळी परिस्थिती पहावली नाही. हरी रामराव राठोड (वय ४०) यांनी सततच्या नापीकीमुळे व शेतातील दुबारपेरणी व कर्जबाजारीपणामुळे शेतातील एका झाडाला १० आॅगस्ट रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. या बाबत परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच अंकुश चांदू चव्हाण (वय ८२) यांनी शेतातील सर्व पिके वाया गेली, दुबार पेरणी तसेच मुलीचे लग्न डोळ्यासमोर असल्याने कर्ज फेडणे अशक्य असल्याचे कारणाने ११ आॅगस्ट रोजी विष घेतले. दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्यामुळे दोन्ही कुटुंबिय उघड्यावर आले आहेत. सेनगाव तालुक्यात अल्प पावसाचे प्रमाण असून चिखलागर तांडा येथे सुद्धा पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे कसेबसे या शेतकऱ्यांनी एकदाची पेरणी केली होती; परंतु प्रचंड पाण्याचा दुष्काळ व त्यातून होणारी हेळसांड, हातचे सोयाबीन पीक गेल्याने आता कर्ज फेडणे अशक्य असल्याने या शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केलेले शेतकरी हरी श्यामराव राठोड यांना जेमतेम दोन ते अडीच एकर जमीन असून ती कोरडवाहू आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना ही घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात २ मुले व ३ मुली, भाऊ, बहिण असा परिवार आहे. दुसरे शेतकरी अंकुश चांदू चव्हाण यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना दोन मुले, तीन मुली, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्याकडे सुद्धा दोन एकर खरबाळ जमीन असून ती पाण्याअभावी नापीक झाली आहे. यातूनच या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. (वार्ताहर)