शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

सात वर्षांपासून शहरात दोन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

हिंगोली: पावसाचे प्रमाण कधी जास्त असते, तर कधी कमी असते. त्यामुळे गत सात वर्षांपासून शहरात दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा ...

हिंगोली: पावसाचे प्रमाण कधी जास्त असते, तर कधी कमी असते. त्यामुळे गत सात वर्षांपासून शहरात दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला. या वर्षीही उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपूनच वापरावे, असे आवाहन आवाहनही नगरपरिषदेने केले आहे.

सद्यस्थितीत शहरात १२ हजार नळ कनेक्शन आहेत. भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून नगरपरिषदेने दोन दिवसाआड पाणी नळांना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सद्यस्थितीत एक तास पाणी सोडत आहोत, परंतु काही नागरिकांनी नळांना पाणी दीड ते दोन तास सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती, पण ते शक्य होत नाही. कारण बहुतांश ठिकाणी कित्येक वेळा पाणी वाया जाते. सण, उत्सव असेल, तेव्हा नागरिकांनी मागणी नाही केली, तरी पाणी १५ ते २० मिनिटे जास्तच सोडले जाते.

आजमितीस शहरात ९ पाण्याच्या टाक्या आहेत. यामध्ये फलटन येथे १ (१८ लाख लीटर पाणी बसते), अजयनगर येथे १ (१५.५ लाख लीटर), खटकाळी बायपास येथे १ (५.५ लाख लीटर), गारमाळ येथे १ (१.५ लाख लीटर), नेहरूनगर येथे १ (९ लाख लीटर), मंगळवारा येथे २ (९ लाख लीटर, ११ लाख लीटर), आदर्श महाविद्यालय येथे २ पाण्याच्या टाक्या असून, त्यात ९-९ लाख लीटर पाणी साठविले जाते.

लिंबाळा येथे स्टोरेज टाकी

औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून पाणी डिग्रस कराळे येथे येते. त्यानंतर, पाणी तेथे फिल्टर केले जाते. पाणी फिल्टर झाले की, लिंबाळा येथील स्टोरेज टाकीमध्ये सोडले जाते. दर पंधरा दिवसाला स्टोरेज टाकी स्वच्छ केली जाते. ही स्टोरेज टाकी २० लाख लीटरची आहे. यानंतर, पाणी शहरातील नळधारकांना सोडले जाते.

- डॉ.अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद.