शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सात वर्षांपासून शहरात दोन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

हिंगोली: पावसाचे प्रमाण कधी जास्त असते, तर कधी कमी असते. त्यामुळे गत सात वर्षांपासून शहरात दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा ...

हिंगोली: पावसाचे प्रमाण कधी जास्त असते, तर कधी कमी असते. त्यामुळे गत सात वर्षांपासून शहरात दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला. या वर्षीही उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपूनच वापरावे, असे आवाहन आवाहनही नगरपरिषदेने केले आहे.

सद्यस्थितीत शहरात १२ हजार नळ कनेक्शन आहेत. भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून नगरपरिषदेने दोन दिवसाआड पाणी नळांना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सद्यस्थितीत एक तास पाणी सोडत आहोत, परंतु काही नागरिकांनी नळांना पाणी दीड ते दोन तास सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती, पण ते शक्य होत नाही. कारण बहुतांश ठिकाणी कित्येक वेळा पाणी वाया जाते. सण, उत्सव असेल, तेव्हा नागरिकांनी मागणी नाही केली, तरी पाणी १५ ते २० मिनिटे जास्तच सोडले जाते.

आजमितीस शहरात ९ पाण्याच्या टाक्या आहेत. यामध्ये फलटन येथे १ (१८ लाख लीटर पाणी बसते), अजयनगर येथे १ (१५.५ लाख लीटर), खटकाळी बायपास येथे १ (५.५ लाख लीटर), गारमाळ येथे १ (१.५ लाख लीटर), नेहरूनगर येथे १ (९ लाख लीटर), मंगळवारा येथे २ (९ लाख लीटर, ११ लाख लीटर), आदर्श महाविद्यालय येथे २ पाण्याच्या टाक्या असून, त्यात ९-९ लाख लीटर पाणी साठविले जाते.

लिंबाळा येथे स्टोरेज टाकी

औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून पाणी डिग्रस कराळे येथे येते. त्यानंतर, पाणी तेथे फिल्टर केले जाते. पाणी फिल्टर झाले की, लिंबाळा येथील स्टोरेज टाकीमध्ये सोडले जाते. दर पंधरा दिवसाला स्टोरेज टाकी स्वच्छ केली जाते. ही स्टोरेज टाकी २० लाख लीटरची आहे. यानंतर, पाणी शहरातील नळधारकांना सोडले जाते.

- डॉ.अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद.