शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

सात वर्षांपासून शहरात दोन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

हिंगोली: पावसाचे प्रमाण कधी जास्त असते, तर कधी कमी असते. त्यामुळे गत सात वर्षांपासून शहरात दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा ...

हिंगोली: पावसाचे प्रमाण कधी जास्त असते, तर कधी कमी असते. त्यामुळे गत सात वर्षांपासून शहरात दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला. या वर्षीही उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपूनच वापरावे, असे आवाहन आवाहनही नगरपरिषदेने केले आहे.

सद्यस्थितीत शहरात १२ हजार नळ कनेक्शन आहेत. भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून नगरपरिषदेने दोन दिवसाआड पाणी नळांना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सद्यस्थितीत एक तास पाणी सोडत आहोत, परंतु काही नागरिकांनी नळांना पाणी दीड ते दोन तास सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती, पण ते शक्य होत नाही. कारण बहुतांश ठिकाणी कित्येक वेळा पाणी वाया जाते. सण, उत्सव असेल, तेव्हा नागरिकांनी मागणी नाही केली, तरी पाणी १५ ते २० मिनिटे जास्तच सोडले जाते.

आजमितीस शहरात ९ पाण्याच्या टाक्या आहेत. यामध्ये फलटन येथे १ (१८ लाख लीटर पाणी बसते), अजयनगर येथे १ (१५.५ लाख लीटर), खटकाळी बायपास येथे १ (५.५ लाख लीटर), गारमाळ येथे १ (१.५ लाख लीटर), नेहरूनगर येथे १ (९ लाख लीटर), मंगळवारा येथे २ (९ लाख लीटर, ११ लाख लीटर), आदर्श महाविद्यालय येथे २ पाण्याच्या टाक्या असून, त्यात ९-९ लाख लीटर पाणी साठविले जाते.

लिंबाळा येथे स्टोरेज टाकी

औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून पाणी डिग्रस कराळे येथे येते. त्यानंतर, पाणी तेथे फिल्टर केले जाते. पाणी फिल्टर झाले की, लिंबाळा येथील स्टोरेज टाकीमध्ये सोडले जाते. दर पंधरा दिवसाला स्टोरेज टाकी स्वच्छ केली जाते. ही स्टोरेज टाकी २० लाख लीटरची आहे. यानंतर, पाणी शहरातील नळधारकांना सोडले जाते.

- डॉ.अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद.