शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कोरोना काळातही क्षयरोग विभागाची शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST

हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केल्यानंतरही या काळात जिल्ह्यातील आरोग्य विभागाने क्षयरोग शोध मोहीम सुरूच ठेवली होती. ...

हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केल्यानंतरही या काळात जिल्ह्यातील आरोग्य विभागाने क्षयरोग शोध मोहीम सुरूच ठेवली होती. दरम्यान, क्षयरोग शोधमोहिमेअंतर्गत १,१५० रुग्ण शोधण्यात यश मिळाले.

हिंगोली जिल्ह्यासाठी १७०० एवढे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. खरे पाहिले तर कोरोना काळात एप्रिल ते सप्टेंबर ही सहा महिने बाहेर पडणेही मुश्कील होते.परंतु, जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचाऱ्यांनी क्षयरोग शोधमोहीम सुरूच ठेवली अन्‌ आजही ती सुरूच आहे. कोरोना संसर्गातही जिल्ह्यातील ७११ गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी प्रयत्न करून १,१५० क्षयरोग रुग्ण शोधण्यात यश मिळविले. रुग्ण शोधमोहीम दरवर्षी न चुकता जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घेण्यात येते. प्रत्येक गावांमध्ये जाऊन क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येते. यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांना मदतीसाठी घेण्यात येऊन जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर क्षयरोग विभाग काम करीत असतो. थुंकीचे नमुने घेतल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह असे तर त्यास औषधोपचार केला जातो. एवढेच नाही तर रुग्ण बरा होईपर्यत त्यावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारीही आरोग्य विभाग पार पाडतो.

गतवर्षी २०२० मध्ये कोरोना महामारीची भीती मनात न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांनी १७०० या दिलेल्या उद्दिष्टांपैकी १,१५० एवढे रुग्ण शोधण्यात यश मिळविले. कोरोना अगोदर २०१९ मध्येही १३५० एवढे क्षयरोग रुग्ण शोधण्यातही आरोग्य विभागाला यशोशिखर गाठता आले. क्षयरुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यासाठी जिल्ह्यात १७ ठिकाणी सूक्ष्मदर्शी यंत्र बसविण्यात आलेले आहेत. यामध्ये हिंगोली, सिरसम, नरसी नामदेव, कळमनुरी, मसवड, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, सेनगाव, गोरेगाव, औंढा नागनाथ, पिंपळदरी, जवळा बाजार, वसमत, हट्टा, कुरुंदा, गिरगाव आदी आरोग्य संस्थांचा समावेश आहे. जानेवारी २० ते डिसेंबर २० या कालावधीत क्षयरुग्ण शोधण्यासाठी ७११ गावांमध्ये जाऊन क्षयरोगाबाबत जनजागृती करत थुंकीचे नमुने घेण्यात आले.

क्षयरोग उपचाराअंति बरा होतो

क्षयरोग हा दुर्धर आजार आहे असा समज आहे.आपल्या थुंकीचे नमुने शोधमोहिमेदरम्यान आलेल्या कर्मचाऱ्याला द्यावे. त्यानंतर हे कर्मचारी थुंकीचे नमुने सूक्ष्मदर्शी यंत्राद्वारे तपासतील. क्षयरोग आहे हे स्पष्ट झाल्यावर त्यास औषधोपचार केला जातो. क्षयरोग रुग्णांनी घाबरून न जाता औषधोपचार वेळेवर घेतल्यास बरा होऊ शकतो. रोग निष्पन्न झाल्यास संपूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. उपचाराअंति क्षयरोग १०० टक्के बरा होतो. अधिक माहिसाठी रुग्णांनी तसेच नातेवाईकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

-डॉ.राहुल गिते, जिल्हा क्षयरोगअधिकारी, हिंगोली