शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

कोरोना काळातही क्षयरोग विभागाची शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST

हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केल्यानंतरही या काळात जिल्ह्यातील आरोग्य विभागाने क्षयरोग शोध मोहीम सुरूच ठेवली होती. ...

हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केल्यानंतरही या काळात जिल्ह्यातील आरोग्य विभागाने क्षयरोग शोध मोहीम सुरूच ठेवली होती. दरम्यान, क्षयरोग शोधमोहिमेअंतर्गत १,१५० रुग्ण शोधण्यात यश मिळाले.

हिंगोली जिल्ह्यासाठी १७०० एवढे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. खरे पाहिले तर कोरोना काळात एप्रिल ते सप्टेंबर ही सहा महिने बाहेर पडणेही मुश्कील होते.परंतु, जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचाऱ्यांनी क्षयरोग शोधमोहीम सुरूच ठेवली अन्‌ आजही ती सुरूच आहे. कोरोना संसर्गातही जिल्ह्यातील ७११ गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी प्रयत्न करून १,१५० क्षयरोग रुग्ण शोधण्यात यश मिळविले. रुग्ण शोधमोहीम दरवर्षी न चुकता जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घेण्यात येते. प्रत्येक गावांमध्ये जाऊन क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येते. यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांना मदतीसाठी घेण्यात येऊन जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर क्षयरोग विभाग काम करीत असतो. थुंकीचे नमुने घेतल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह असे तर त्यास औषधोपचार केला जातो. एवढेच नाही तर रुग्ण बरा होईपर्यत त्यावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारीही आरोग्य विभाग पार पाडतो.

गतवर्षी २०२० मध्ये कोरोना महामारीची भीती मनात न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांनी १७०० या दिलेल्या उद्दिष्टांपैकी १,१५० एवढे रुग्ण शोधण्यात यश मिळविले. कोरोना अगोदर २०१९ मध्येही १३५० एवढे क्षयरोग रुग्ण शोधण्यातही आरोग्य विभागाला यशोशिखर गाठता आले. क्षयरुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यासाठी जिल्ह्यात १७ ठिकाणी सूक्ष्मदर्शी यंत्र बसविण्यात आलेले आहेत. यामध्ये हिंगोली, सिरसम, नरसी नामदेव, कळमनुरी, मसवड, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, सेनगाव, गोरेगाव, औंढा नागनाथ, पिंपळदरी, जवळा बाजार, वसमत, हट्टा, कुरुंदा, गिरगाव आदी आरोग्य संस्थांचा समावेश आहे. जानेवारी २० ते डिसेंबर २० या कालावधीत क्षयरुग्ण शोधण्यासाठी ७११ गावांमध्ये जाऊन क्षयरोगाबाबत जनजागृती करत थुंकीचे नमुने घेण्यात आले.

क्षयरोग उपचाराअंति बरा होतो

क्षयरोग हा दुर्धर आजार आहे असा समज आहे.आपल्या थुंकीचे नमुने शोधमोहिमेदरम्यान आलेल्या कर्मचाऱ्याला द्यावे. त्यानंतर हे कर्मचारी थुंकीचे नमुने सूक्ष्मदर्शी यंत्राद्वारे तपासतील. क्षयरोग आहे हे स्पष्ट झाल्यावर त्यास औषधोपचार केला जातो. क्षयरोग रुग्णांनी घाबरून न जाता औषधोपचार वेळेवर घेतल्यास बरा होऊ शकतो. रोग निष्पन्न झाल्यास संपूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. उपचाराअंति क्षयरोग १०० टक्के बरा होतो. अधिक माहिसाठी रुग्णांनी तसेच नातेवाईकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

-डॉ.राहुल गिते, जिल्हा क्षयरोगअधिकारी, हिंगोली