शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

ग्रामीण भागातील प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ...

कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका

हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार तर अवैध प्रवासी वाहतुकीवरच आहे. त्यातही एसटी आगाराकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने याचाही परिणाम बसफेऱ्या सोडण्यावर होत आहे.

कोरोना संसर्ग आजाराने संपूर्ण जग हातबल झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आतापर्यंत ३ हजार ६६० वर पोचली आहे. लॉकडाउनमुळे तर जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. या काळात तर सर्वच कर्मचाऱ्यांना कामाअभावी घरी बसून रहावे लागले. आता कुठे शासनाने काही नियम शिथील केल्याने प्रमुख मार्गावर बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. हिंगोली आगारातून नांदेड, वाशीम, अकोला, परभणीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसेस सोडण्यात येत आहेत. मोठ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली असली तरी अद्याप ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. हिंगोली आगारातून सध्या सेनगाव, रिसोड, खानापूर, सावरगाव आदी मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. तर जांभरून मार्गावर २२ जानेवारीपासून बस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील काही मार्गावर बसफेऱ्या सुरू केल्या असल्या तरी अद्याप अनेक मार्गावरील प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा आहे.

३२ कर्मचारी बेस्टसाठी रवाना

हिंगोली येथील एसटी आगारासाठी १२० वाहक तर १२० चालक राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टमध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने हिंगोली आगारातील प्रत्येकी १६ वाहक, चालकांना मुंबईला बेस्टमध्ये पाठविले आहेत. त्यामुळे हिंगोली आगारामध्ये मष्युबळाची कमतरता जाणवत आहे. याचा परिमाण बसफेऱ्या सोडण्यावरही होत आहे.

२१ बसेस मानव विकाससाठी

हिंगोली आगाराकडे जवळपास ५८ बसेस उपलब्ध आहेत. १० जानेवारीपासून १० बसेस बेस्टसाठी पाठविण्यात आल्या आहेत. आता केवळ ४८ बसेस शिल्लक आहेत. पूर्वी जवळपास १४ फेऱ्या ग्रामीण भागात होत होत्या. मात्र सध्या केवळ पाच ते सहा मार्गावरच फेऱ्या सोडण्यात येत आहेत. यातील २१ बसेस मानव विकास अंतर्गत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येतात. शाळा सुरू नसल्या तरी सध्या विद्यार्थ्यांना पास देण्यात येत असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.