शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

ग्रामीण भागातील प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ...

कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका

हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार तर अवैध प्रवासी वाहतुकीवरच आहे. त्यातही एसटी आगाराकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने याचाही परिणाम बसफेऱ्या सोडण्यावर होत आहे.

कोरोना संसर्ग आजाराने संपूर्ण जग हातबल झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आतापर्यंत ३ हजार ६६० वर पोचली आहे. लॉकडाउनमुळे तर जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. या काळात तर सर्वच कर्मचाऱ्यांना कामाअभावी घरी बसून रहावे लागले. आता कुठे शासनाने काही नियम शिथील केल्याने प्रमुख मार्गावर बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. हिंगोली आगारातून नांदेड, वाशीम, अकोला, परभणीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसेस सोडण्यात येत आहेत. मोठ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली असली तरी अद्याप ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. हिंगोली आगारातून सध्या सेनगाव, रिसोड, खानापूर, सावरगाव आदी मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. तर जांभरून मार्गावर २२ जानेवारीपासून बस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील काही मार्गावर बसफेऱ्या सुरू केल्या असल्या तरी अद्याप अनेक मार्गावरील प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा आहे.

३२ कर्मचारी बेस्टसाठी रवाना

हिंगोली येथील एसटी आगारासाठी १२० वाहक तर १२० चालक राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टमध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने हिंगोली आगारातील प्रत्येकी १६ वाहक, चालकांना मुंबईला बेस्टमध्ये पाठविले आहेत. त्यामुळे हिंगोली आगारामध्ये मष्युबळाची कमतरता जाणवत आहे. याचा परिमाण बसफेऱ्या सोडण्यावरही होत आहे.

२१ बसेस मानव विकाससाठी

हिंगोली आगाराकडे जवळपास ५८ बसेस उपलब्ध आहेत. १० जानेवारीपासून १० बसेस बेस्टसाठी पाठविण्यात आल्या आहेत. आता केवळ ४८ बसेस शिल्लक आहेत. पूर्वी जवळपास १४ फेऱ्या ग्रामीण भागात होत होत्या. मात्र सध्या केवळ पाच ते सहा मार्गावरच फेऱ्या सोडण्यात येत आहेत. यातील २१ बसेस मानव विकास अंतर्गत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येतात. शाळा सुरू नसल्या तरी सध्या विद्यार्थ्यांना पास देण्यात येत असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.