शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ...

कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका

हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार तर अवैध प्रवासी वाहतुकीवरच आहे. त्यातही एसटी आगाराकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने याचाही परिणाम बसफेऱ्या सोडण्यावर होत आहे.

कोरोना संसर्ग आजाराने संपूर्ण जग हातबल झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आतापर्यंत ३ हजार ६६० वर पोचली आहे. लॉकडाउनमुळे तर जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. या काळात तर सर्वच कर्मचाऱ्यांना कामाअभावी घरी बसून रहावे लागले. आता कुठे शासनाने काही नियम शिथील केल्याने प्रमुख मार्गावर बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. हिंगोली आगारातून नांदेड, वाशीम, अकोला, परभणीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसेस सोडण्यात येत आहेत. मोठ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली असली तरी अद्याप ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. हिंगोली आगारातून सध्या सेनगाव, रिसोड, खानापूर, सावरगाव आदी मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. तर जांभरून मार्गावर २२ जानेवारीपासून बस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील काही मार्गावर बसफेऱ्या सुरू केल्या असल्या तरी अद्याप अनेक मार्गावरील प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा आहे.

३२ कर्मचारी बेस्टसाठी रवाना

हिंगोली येथील एसटी आगारासाठी १२० वाहक तर १२० चालक राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टमध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने हिंगोली आगारातील प्रत्येकी १६ वाहक, चालकांना मुंबईला बेस्टमध्ये पाठविले आहेत. त्यामुळे हिंगोली आगारामध्ये मष्युबळाची कमतरता जाणवत आहे. याचा परिमाण बसफेऱ्या सोडण्यावरही होत आहे.

२१ बसेस मानव विकाससाठी

हिंगोली आगाराकडे जवळपास ५८ बसेस उपलब्ध आहेत. १० जानेवारीपासून १० बसेस बेस्टसाठी पाठविण्यात आल्या आहेत. आता केवळ ४८ बसेस शिल्लक आहेत. पूर्वी जवळपास १४ फेऱ्या ग्रामीण भागात होत होत्या. मात्र सध्या केवळ पाच ते सहा मार्गावरच फेऱ्या सोडण्यात येत आहेत. यातील २१ बसेस मानव विकास अंतर्गत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येतात. शाळा सुरू नसल्या तरी सध्या विद्यार्थ्यांना पास देण्यात येत असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.