हिंगोली रेल्वे स्टेशनवरून आजमितीस रोज इंटरसिटी (काचीगुडा ते नारखेड) ही रेल्वेगाडी धावते. त्या व्यतिरिक्त जयपूर ते हैदराबाद, तिरुपती ते अमरावती, जयपूर ते सिकंदराबाद आणि नांदेड ते गंगानगर (द्वारा सुरत) या आठवडी रेल्वे गाड्याही धावतात. परंतु, सध्या तरी कोरोना महामारीमुळे या रेल्वे गाड्यांनाही म्हणावी तशी प्रवासी संख्या मिळत नाही. कोरोना महामारीमुळे प्लॅटफाॅर्म तिकीट शासनाने वाढविले होते. परंतु, २०१९, २०२० व २०२१ या काळात प्लॅटफार्म तिकिटाचे काहीच उत्पन्न झाले नाही, असेही रेल्वे विभागाने सांगितले.
तिकिटाची किंमत कमी नाही
कोरोना काळात लोकांनी प्लॅटफॉर्मवर येऊन विनाकारण गर्दी करू नये म्हणून शासनाने प्लॅटफाॅर्म तिकिटाची किंमत वाढविली होती. आज कोरोना महामारीची लाट ओसरली असली तरी रुग्ण हे रोजच आढळून येत आहेत. प्लॅटफाॅर्म तिकीट अजून तरी कमी झाले नाही. जी किंमत कोरोना काळात होती तीच आहे. शासनाची सूचना आल्यास तिकिटाची किंमत कमी केली जाईल, असे रेल्वे विभागाने सांगितले.
कोरोनाचे नियम बंधनकारक...
कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी प्रवाशांनी विनाकारण स्टेशनवर गर्दी करू नये, अशा सूचना प्रवाशांना दिल्या जात आहेत. काही प्रवासी नातेवाइकांना घेऊन स्टेशनवर येत आहेत. त्यांना स्टेशनच्या बाहेरच थांबविले जात आहे. कोरोना महामारी लक्षात घेऊन सध्यातरी इंटरसिटी ही एकच रेल्वे रोज धावते. दुसरीकडे कोणत्याही रेल्वेगाडीला म्हणावी तेवढी गर्दी नाही.
- अलोक नारायण, स्टेशन अधीक्षक, हिंगोली