शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जड वाहनांमुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:29 IST

विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना ...

विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त

कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना पाणी मुबलक प्रमाणात असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी पीके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा या राज्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. संबंधित विभागाने वेळीच याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

पेन्शनपुरा येथे रस्त्यावर पाणीच पाणीहिंगोली: शहरातील पेन्शनपुरा भागात रस्त्यावर नालीचे पाणी आले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालक तसेच नागरिकांना त्रास होत आहे. या घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन घाण पाण्याला वाट मोकळी करुन देवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील नांदेडनाका, शास्त्रीनगर, इंदिरा चौक आदी भागामध्ये मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

‘नाल्यांवर औषध फवारणी करा’

हिंगोली: शहरातील कमलानगर, शाहूनगर, जीजामातानगर आदी नगरांतील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देवून नाल्यांवर औषध फवारणी करुन धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शेतकरी शेती कामात व्यस्त

पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरातील शेतकरी सध्या शेती कामात व्यस्त असलञयाचे पहावयास मिळत आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांची उगवणही चांगली झाली आहे. यावर्षी पाणी मुबलक प्रमाणात असल्याने रबी हंगाम चांगला येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

दुभाजकाची मागणी

हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून दुभाजक बसविण्यात आलेले नाही. अनेक वेळा मागणी करुनही कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. वाहनेही वेगाने या ठिकाणावरुन चालविली जात आहेत. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी व रेल्वे उड्डाण पुलावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.