शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनांमुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:29 IST

विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना ...

विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त

कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना पाणी मुबलक प्रमाणात असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी पीके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा या राज्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. संबंधित विभागाने वेळीच याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

पेन्शनपुरा येथे रस्त्यावर पाणीच पाणीहिंगोली: शहरातील पेन्शनपुरा भागात रस्त्यावर नालीचे पाणी आले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालक तसेच नागरिकांना त्रास होत आहे. या घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन घाण पाण्याला वाट मोकळी करुन देवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील नांदेडनाका, शास्त्रीनगर, इंदिरा चौक आदी भागामध्ये मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

‘नाल्यांवर औषध फवारणी करा’

हिंगोली: शहरातील कमलानगर, शाहूनगर, जीजामातानगर आदी नगरांतील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देवून नाल्यांवर औषध फवारणी करुन धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शेतकरी शेती कामात व्यस्त

पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरातील शेतकरी सध्या शेती कामात व्यस्त असलञयाचे पहावयास मिळत आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांची उगवणही चांगली झाली आहे. यावर्षी पाणी मुबलक प्रमाणात असल्याने रबी हंगाम चांगला येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

दुभाजकाची मागणी

हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून दुभाजक बसविण्यात आलेले नाही. अनेक वेळा मागणी करुनही कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. वाहनेही वेगाने या ठिकाणावरुन चालविली जात आहेत. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी व रेल्वे उड्डाण पुलावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.