शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनांमुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:29 IST

विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना ...

विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त

कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना पाणी मुबलक प्रमाणात असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी पीके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा या राज्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. संबंधित विभागाने वेळीच याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

पेन्शनपुरा येथे रस्त्यावर पाणीच पाणीहिंगोली: शहरातील पेन्शनपुरा भागात रस्त्यावर नालीचे पाणी आले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालक तसेच नागरिकांना त्रास होत आहे. या घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन घाण पाण्याला वाट मोकळी करुन देवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील नांदेडनाका, शास्त्रीनगर, इंदिरा चौक आदी भागामध्ये मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

‘नाल्यांवर औषध फवारणी करा’

हिंगोली: शहरातील कमलानगर, शाहूनगर, जीजामातानगर आदी नगरांतील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देवून नाल्यांवर औषध फवारणी करुन धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शेतकरी शेती कामात व्यस्त

पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरातील शेतकरी सध्या शेती कामात व्यस्त असलञयाचे पहावयास मिळत आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांची उगवणही चांगली झाली आहे. यावर्षी पाणी मुबलक प्रमाणात असल्याने रबी हंगाम चांगला येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

दुभाजकाची मागणी

हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून दुभाजक बसविण्यात आलेले नाही. अनेक वेळा मागणी करुनही कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. वाहनेही वेगाने या ठिकाणावरुन चालविली जात आहेत. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी व रेल्वे उड्डाण पुलावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.