शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जड वाहनांमुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:29 IST

विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना ...

विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त

कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विहिरींना पाणी मुबलक प्रमाणात असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी पीके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा या राज्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. संबंधित विभागाने वेळीच याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

पेन्शनपुरा येथे रस्त्यावर पाणीच पाणीहिंगोली: शहरातील पेन्शनपुरा भागात रस्त्यावर नालीचे पाणी आले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालक तसेच नागरिकांना त्रास होत आहे. या घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन घाण पाण्याला वाट मोकळी करुन देवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील नांदेडनाका, शास्त्रीनगर, इंदिरा चौक आदी भागामध्ये मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

‘नाल्यांवर औषध फवारणी करा’

हिंगोली: शहरातील कमलानगर, शाहूनगर, जीजामातानगर आदी नगरांतील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देवून नाल्यांवर औषध फवारणी करुन धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शेतकरी शेती कामात व्यस्त

पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरातील शेतकरी सध्या शेती कामात व्यस्त असलञयाचे पहावयास मिळत आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांची उगवणही चांगली झाली आहे. यावर्षी पाणी मुबलक प्रमाणात असल्याने रबी हंगाम चांगला येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

दुभाजकाची मागणी

हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून दुभाजक बसविण्यात आलेले नाही. अनेक वेळा मागणी करुनही कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. वाहनेही वेगाने या ठिकाणावरुन चालविली जात आहेत. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी व रेल्वे उड्डाण पुलावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.