शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोचा भाव एकदम उतरला; मंडईत लागला टोमॅटोचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. मार्च महिना अर्ध्यावर आला असला तरी पाण्याची कमतरता नाही. भाजीपाल्याचे उत्पादनही शेतकरी ...

यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. मार्च महिना अर्ध्यावर आला असला तरी पाण्याची कमतरता नाही. भाजीपाल्याचे उत्पादनही शेतकरी मोठ्या प्रमाणात काढत आहेत. परंतु, कोरोना संसर्गामुळे ग्राहक बाहेर पडण्यास धजत नाहीत. त्याचबरोबर भाजी विक्रेत्यांना सकाळी दहा ते दुपारी तीन अशी वेळ भाजी विक्रीसाठी दिली आहे. त्यामुळे वेळेचे भान ठेवत भाजीपाला विकण्याची वेळ विक्रेत्यावर आली आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम घालून दिल्यामुळे ग्राहकही वेळेतच भाजी खरेदीसाठी येत आहेत. भाजी मंडईसाठी दुपारी तीनची वेळ दिली असली तरी अडीच वाजल्यापासूनच भाज्या गुंडाळून ठेवण्याची तयारी करावी लागते. टोमॅटोबरोबरच इतर भाज्यांचेही भाव मंगळवारी उतरले होते. शेवगा १०, मेथी १०, कांदा १०, काकडी ६, चवळी १०, वांगे ५, कोथिंबीर ५ छटाक, कद्दू ५ रुपयास एक, पता कोबी ५, फूल कोबी ५ रुपये, गाजर ८ रुपये किलो, हिरवी मिरची १० रुपये, भेंडी २० रुपये किलो याप्रमाणे विक्री झाली.

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे, लिंबाळा, डोंगरकडा, खानापूर, सावरखेडा, पिंपळखुटा, बासंबा, बळसोंड आदी जवळपासच्या खेड्यातून भाजी उत्पादक शेतकरी भाज्या घेऊन मंडईत येतात. परंतु, मंडईतील ठोक विक्रेते कोरोना आजारामुळे ग्राहक मिळेना झाले असल्यामुळे शेतकऱ्यांकडील भाज्या कमी प्रमाणात विकत घेत आहेत. त्यामुळे टेम्पो व इतर वाहनांनी आणलेल्या भाज्या परत नेण्याऐवजी कमी किमतीत ठोक विक्रेत्यांना देत आहेत. त्यामुळे भाजी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे छोटे भाजी विक्रेते तीन वाजेपर्यंत जेवढ्या भाज्या विकतील तेवढ्याच खरेदी करीत असल्याचे मुजीब बागवान यांनी सांगितले.