शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

या बसेस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:32 IST

हिंगोली : कोरोनामुळे तब्बल दीड वर्षापासून तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाने आता कुठे कात टाकली होती. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असताना ...

हिंगोली : कोरोनामुळे तब्बल दीड वर्षापासून तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाने आता कुठे कात टाकली होती. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असताना आता गळक्या बसेसची चिंता आगार प्रशासनाला भेडसावत आहे. गळक्या बसेसला वेदर स्ट्रीप लावून पावसाचे पाणी थोपविण्याचा प्रयत्न आगार प्रशासन करीत आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या काळात एसटी बसेस सुरू नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावेत, याची चिंता एसटी प्रशासनाला लागली होती. जिल्ह्यासह राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुन्हा एसटी बसेस सुरू करण्यात आल्या. प्रमुख मार्गावर बसेस धावत असल्याने प्रवासी भाड्यातून उत्पन्न हाती येत आहे. एसटीचा कारभार पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच हिंगोली आगार प्रशासनाला डिझेल टंचाईसारख्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. त्यात गळक्या एसटी बसेस डोकेदुखी ठरत आहेत. आगाराकडे ५८ बसेस असल्या तरी यातील बहुतांश बसेस पावसात गळत आहेत. टपावरून पाणी थेट आतमध्ये येत असल्याने प्रवासी चिंब होत आहेत. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच व चांगली बस बघूनच प्रवासी बसमध्ये चढत आहेत. प्रवाशांची नाराजी लक्षात घेता गळक्या बसेसला वेदर स्ट्रीप लावण्याचे काम हाती घेतले आहे. बहुतांश बसेसला वेदर स्ट्रीप बसविण्यात आल्या आहेत. बस गळत असल्याचे दिसताच दुरुस्ती केली जात आहे.

- पी.बी. चौथमल, आगार व्यवस्थापक, हिंगोली

एसटीचा कसरतीचा प्रवास

ग्रामीण भागात काही मार्गावर बसेस सोडण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र खिळखिळ्या बसेस सोडल्या जात असल्याने पावसाच्या पाण्यात गळत आहेत. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.- दीपक मगर, पळसोना

हिंगोली आगारातील काही बसेसला टपावर ठिगळ लावले आहे. यामधून पावसाचे पाणी बसमध्ये शिरत असल्याने अंगावरील कपडे भिजत आहेत.

- यादव जारे, केंद्रा बु.

गाड्यांचा मेंटेनन्स वाढला

कोरोना काळात बहुतांश बसेस एकाच जागेवर उभ्या होत्या. बसेस चांगल्या स्थितीत रहाव्यात, यासाठी आगार प्रशासनाने काळजी घेतली. तरीही हिंगोली आगारातील काही बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे मेंटेनन्स वाढला. बस दुरुस्तीसाठी आगाराला आर्थिक ओढाताण सहन करावी लागत आहे.