शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

जिल्हा नियोजनच्या ५० टक्के निधीची अजून मागणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

जिल्हा परिषदेला सर्वाधिक निधी वार्षिक योजनेत दिला जातो. मात्र याच संस्थेकडूनही प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. ...

जिल्हा परिषदेला सर्वाधिक निधी वार्षिक योजनेत दिला जातो. मात्र याच संस्थेकडूनही प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. मंजूर नियतव्ययाप्रमाणे समिती, सर्वसाधारण सभा अशा ठरलेल्या चाकोरीत नियोजन करून हे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसह सादर करून निधी मागणी करणे आवश्यक असते. मात्र यंदा जि.प.कडून अद्याप तब्बल ४५ कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर झाले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य, शिक्षण, पंचायत, महिला व बालकल्याण, समाजकल्याण अशा अनेक विभागांची ही अवस्था आहे. बांधकाम विभागाने काही प्रस्ताव दिले असले तरीही दीड पट नियोजन व दायित्वाचा मुद्दा अजूनही प्रलंबितच आहे. काही नगरपालिकांच्या प्रस्तावांचीही अशीच अवस्था आहे.

जि. प.च्या या परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अनेकदा कानपिचक्या दिल्या आहेत. मात्र तरीही जि. प. प्रशासनाला काही जाग यायला तयार नाही. जसजसा मार्चएण्ड जवळ येईल, तसे हे विभाग जागे होतात, हा दरवर्षीचाच अनुभव आहे. दोन वर्षे निधी वापराची मुभा असलयाने जि. प.कडून त्याचा गैरफायदा घेतला जातो. मात्र यात निधी परत जाण्याची नामुष्की ओढवण्याची भीतीही नाकारता येत नाही. गतवर्षी वेळेपूर्वीच बीडीएस बंद झाल्याने अडचण झाली होती. तरीही जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी मिळविण्यात नियोजन विभाग यशस्वी ठरला होता. आयपास प्रणालीत प्रस्ताव सादर न केल्याने अनेक जिल्ह्यांच्या निधीला कात्री लागली होती. हिंगोलीने मात्र आयपासवर आधीच प्रस्ताव सादर केले होते. नियोजन विभागाने जिल्ह्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली.