शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

जिल्हा नियोजनच्या ५० टक्के निधीची अजून मागणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

जिल्हा परिषदेला सर्वाधिक निधी वार्षिक योजनेत दिला जातो. मात्र याच संस्थेकडूनही प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. ...

जिल्हा परिषदेला सर्वाधिक निधी वार्षिक योजनेत दिला जातो. मात्र याच संस्थेकडूनही प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. मंजूर नियतव्ययाप्रमाणे समिती, सर्वसाधारण सभा अशा ठरलेल्या चाकोरीत नियोजन करून हे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसह सादर करून निधी मागणी करणे आवश्यक असते. मात्र यंदा जि.प.कडून अद्याप तब्बल ४५ कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर झाले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य, शिक्षण, पंचायत, महिला व बालकल्याण, समाजकल्याण अशा अनेक विभागांची ही अवस्था आहे. बांधकाम विभागाने काही प्रस्ताव दिले असले तरीही दीड पट नियोजन व दायित्वाचा मुद्दा अजूनही प्रलंबितच आहे. काही नगरपालिकांच्या प्रस्तावांचीही अशीच अवस्था आहे.

जि. प.च्या या परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अनेकदा कानपिचक्या दिल्या आहेत. मात्र तरीही जि. प. प्रशासनाला काही जाग यायला तयार नाही. जसजसा मार्चएण्ड जवळ येईल, तसे हे विभाग जागे होतात, हा दरवर्षीचाच अनुभव आहे. दोन वर्षे निधी वापराची मुभा असलयाने जि. प.कडून त्याचा गैरफायदा घेतला जातो. मात्र यात निधी परत जाण्याची नामुष्की ओढवण्याची भीतीही नाकारता येत नाही. गतवर्षी वेळेपूर्वीच बीडीएस बंद झाल्याने अडचण झाली होती. तरीही जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी मिळविण्यात नियोजन विभाग यशस्वी ठरला होता. आयपास प्रणालीत प्रस्ताव सादर न केल्याने अनेक जिल्ह्यांच्या निधीला कात्री लागली होती. हिंगोलीने मात्र आयपासवर आधीच प्रस्ताव सादर केले होते. नियोजन विभागाने जिल्ह्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली.