शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हिंगोलीत दगडफेकीमुळे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:29 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुण सोनारगल्ली भागात बसले होते. ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुण सोनारगल्ली भागात बसले होते. तेव्हा काही तरुणांनी त्यांना दगड मारले. यावरून आधी वाद झाला आणि नंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. दोन्ही गटांकडून मोठा जमाव आला. त्या हाणामारीत काहींनी तलवारींचाही मुक्त वापर केल्याचे सांगितले जात असून यामुळे सहा ते सात जण जखमी झाले. या वादात कुणीच सोडविण्यासाठी प्रयत्न न केल्याने काही वेळाने प्रकरण जास्त चिघळले. पुन्हा दगडफेक झाली. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे दगड व विटा पसरल्याचे दिसून येत होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडित कच्छवे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती लक्षात घेऊन दंगल नियंत्रण पथक मागविण्यात आले आहे. सध्या रिसालाबाजार परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असून सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगितले जात आहे. तर या घटनेमध्ये सहा जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणातील संबंधितांना ताब्यात घेण्यासाठी पथके नेमण्यात येणार आहेत.