शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा जवळच्या महाविद्यालयांकडेच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

हिंगोली : अकरावी, बारावीसाठी पैकीच्या पैकी मिळणारे अंतर्गत मूल्यमापणाचे गुण लक्षात घेता गावाजवळच्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला ...

हिंगोली : अकरावी, बारावीसाठी पैकीच्या पैकी मिळणारे अंतर्गत मूल्यमापणाचे गुण लक्षात घेता गावाजवळच्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. गतवर्षी जवळच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली होती. यावर्षी दहावीचा निकाल उंचावला असून विद्यार्थी आतापासूनच प्रवेशासाठी तयारी करीत आहेत.

ग्रामीण भागात दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अकरावीसाठी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असायचा. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी नांदेड, औरंगाबादसारख्या शहरात शिक्षणासाठी जात होते. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील संस्थाचालक, प्राचार्य आटापिटा करीत होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून शहरी महाविद्यालयात प्रवेश घेण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. गावाजवळ असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील महाविद्यालयेदेखील विद्यार्थ्यांनी गजबजत आहेत. गतवर्षी दहावीचा ९१,९४ टक्के निकाल लागला होता. तरीही ग्रामीण भागातील महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची चांगलीच धावपळ झाली होती. या वर्षी तर दहावीचा निकाल उंचावला असून निकाल ९९.२५ टक्के लागला आहे. तब्बल १६ हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असले तरी काही विद्यार्थी, पालक आतापासूनच जवळच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

अकरावीसाठी गावात प्रवेश का?

अकरावी, बारावीला ३० गुण अंतर्गत मूल्यमापनाला दिले जातात. ग्रामीण भागातील महाविद्यालयात जास्तीत जास्त गुण दिले जातात. तसेच काही विद्यार्थी अकरावीपासूनच बारावी व साईटीच्या अभ्यासाला लागतात. एकदा ग्रामीण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शहरी भागात क्लासेस लावण्यावरही काही पालकांचा भर असतो. त्यामुळेही अकरावीला ग्रामीण भागात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रवेश

अकरावीच्या प्रवेशासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळाल्या नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे अकरावीला विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. सध्या प्रवेशासंदर्भात काही सांगता येणार नाही.

- डी. बी. जोशी, प्राचार्य, बाराशीव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय, बाराशीव

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे टी. सी. उपलब्ध होण्यास वेळ लागेल. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी विचारणा करीत आहेत. त्यांच्याकडून आधार कार्ड व प्रवेश फार्म भरून घेतला जात असून तात्पुरता प्रवेश दिला जात आहे.

- गोविंद वाघ, प्राचार्य, गोकुळनाथ क. महाविद्यालय, आडगाव रंज

अकरावीसाठी हवा असलेला अभ्यासक्रम ग्रामीण भागातही उपलब्ध झाला आहे. शिवाय महाविद्यालय गावाजवळ असल्याने खर्चात बचत होते. तसेच ओखळीचे प्राध्यापक असल्याने अभ्यासाविषयी अडचण येत नाही.

-ऋषिकेश खराटे

ग्रामीण भागातही विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाले असून क्लासेसही घेतले जातात. घर जवळ असल्याने अनावश्यक खर्च वाचतो. त्यामुळे शहरात प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेतला.

-गणेश खराटे

जिल्ह्यात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ११२

एकूण जागा - २०३६०

गेल्या वर्षी किती जणांनी प्रवेश घेतला - १८२५५

किती जागा रिक्त राहिल्या - २१०५