शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा जवळच्या महाविद्यालयांकडेच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

हिंगोली : अकरावी, बारावीसाठी पैकीच्या पैकी मिळणारे अंतर्गत मूल्यमापणाचे गुण लक्षात घेता गावाजवळच्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला ...

हिंगोली : अकरावी, बारावीसाठी पैकीच्या पैकी मिळणारे अंतर्गत मूल्यमापणाचे गुण लक्षात घेता गावाजवळच्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. गतवर्षी जवळच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली होती. यावर्षी दहावीचा निकाल उंचावला असून विद्यार्थी आतापासूनच प्रवेशासाठी तयारी करीत आहेत.

ग्रामीण भागात दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अकरावीसाठी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असायचा. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी नांदेड, औरंगाबादसारख्या शहरात शिक्षणासाठी जात होते. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील संस्थाचालक, प्राचार्य आटापिटा करीत होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून शहरी महाविद्यालयात प्रवेश घेण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. गावाजवळ असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील महाविद्यालयेदेखील विद्यार्थ्यांनी गजबजत आहेत. गतवर्षी दहावीचा ९१,९४ टक्के निकाल लागला होता. तरीही ग्रामीण भागातील महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची चांगलीच धावपळ झाली होती. या वर्षी तर दहावीचा निकाल उंचावला असून निकाल ९९.२५ टक्के लागला आहे. तब्बल १६ हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असले तरी काही विद्यार्थी, पालक आतापासूनच जवळच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

अकरावीसाठी गावात प्रवेश का?

अकरावी, बारावीला ३० गुण अंतर्गत मूल्यमापनाला दिले जातात. ग्रामीण भागातील महाविद्यालयात जास्तीत जास्त गुण दिले जातात. तसेच काही विद्यार्थी अकरावीपासूनच बारावी व साईटीच्या अभ्यासाला लागतात. एकदा ग्रामीण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शहरी भागात क्लासेस लावण्यावरही काही पालकांचा भर असतो. त्यामुळेही अकरावीला ग्रामीण भागात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रवेश

अकरावीच्या प्रवेशासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळाल्या नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे अकरावीला विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. सध्या प्रवेशासंदर्भात काही सांगता येणार नाही.

- डी. बी. जोशी, प्राचार्य, बाराशीव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय, बाराशीव

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे टी. सी. उपलब्ध होण्यास वेळ लागेल. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी विचारणा करीत आहेत. त्यांच्याकडून आधार कार्ड व प्रवेश फार्म भरून घेतला जात असून तात्पुरता प्रवेश दिला जात आहे.

- गोविंद वाघ, प्राचार्य, गोकुळनाथ क. महाविद्यालय, आडगाव रंज

अकरावीसाठी हवा असलेला अभ्यासक्रम ग्रामीण भागातही उपलब्ध झाला आहे. शिवाय महाविद्यालय गावाजवळ असल्याने खर्चात बचत होते. तसेच ओखळीचे प्राध्यापक असल्याने अभ्यासाविषयी अडचण येत नाही.

-ऋषिकेश खराटे

ग्रामीण भागातही विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाले असून क्लासेसही घेतले जातात. घर जवळ असल्याने अनावश्यक खर्च वाचतो. त्यामुळे शहरात प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेतला.

-गणेश खराटे

जिल्ह्यात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ११२

एकूण जागा - २०३६०

गेल्या वर्षी किती जणांनी प्रवेश घेतला - १८२५५

किती जागा रिक्त राहिल्या - २१०५