शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

उन्हाळी भुईमुगानेही सोडली शेतकऱ्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST

करंजी : गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपांतील नगदी पिके पूर्णत: पाण्यात गेली. असे असले तरी ...

करंजी : गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपांतील नगदी पिके पूर्णत: पाण्यात गेली. असे असले तरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई उन्हाळी भुईमूग भरून काढील असे वाटले होते. परंतु, पहिला टप्पा वगळता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील भुईमुगाने शेतकऱ्यांची साथ सोडल्याचे करंजी व परिसरात पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, आदी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर शासनाने नुकसान भरपाई म्हणून मदतही जाहीर केली; परंतु शासनाची मदत काहींच्या पदरात पडली, तर काहींना अजूनही पदर पसरून बँकेेचे हेलपाटे मारावे लागत आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अजूनही शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर करंजी, दारेफळ, विरेगाव, बळेगाव, गुंडा, आदी दहा ते बारा गावांतील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली. साडेतीन महिन्यांनंतर का होईना, पीक चांगले आले तर भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले होते. यानंतर दहा ते बारा शेतकऱ्यांनी भुईमुगाचा पेराही घेतला. तीन-चार शेतकरी वगळता बाकी शेतकऱ्यांच्या पदरी भुईमुगाचा काढाच शिल्लक राहिला आहे. सुक्या शेंगांना पाच हजार तर ओल्या शेंगांना अडीच हजार भाव आज दिला जात असला तरी भुईमुगासाठी केेलेल्या खर्चाच्या मानाने तो कमीच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मृग नक्षत्राची शेतकरी वाट पाहतोय....

करंजी व परिसरातील शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण केली आहे. आता शेतकरी मृग नक्षत्राची वाट पाहत बसला आहे. या वर्षी मृग नक्षत्र चांगली साथ देईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाने खरीप हंगामात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.