शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

उन्हाळी भुईमुगानेही सोडली शेतकऱ्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST

करंजी : गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपांतील नगदी पिके पूर्णत: पाण्यात गेली. असे असले तरी ...

करंजी : गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपांतील नगदी पिके पूर्णत: पाण्यात गेली. असे असले तरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई उन्हाळी भुईमूग भरून काढील असे वाटले होते. परंतु, पहिला टप्पा वगळता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील भुईमुगाने शेतकऱ्यांची साथ सोडल्याचे करंजी व परिसरात पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, आदी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर शासनाने नुकसान भरपाई म्हणून मदतही जाहीर केली; परंतु शासनाची मदत काहींच्या पदरात पडली, तर काहींना अजूनही पदर पसरून बँकेेचे हेलपाटे मारावे लागत आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अजूनही शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर करंजी, दारेफळ, विरेगाव, बळेगाव, गुंडा, आदी दहा ते बारा गावांतील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली. साडेतीन महिन्यांनंतर का होईना, पीक चांगले आले तर भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले होते. यानंतर दहा ते बारा शेतकऱ्यांनी भुईमुगाचा पेराही घेतला. तीन-चार शेतकरी वगळता बाकी शेतकऱ्यांच्या पदरी भुईमुगाचा काढाच शिल्लक राहिला आहे. सुक्या शेंगांना पाच हजार तर ओल्या शेंगांना अडीच हजार भाव आज दिला जात असला तरी भुईमुगासाठी केेलेल्या खर्चाच्या मानाने तो कमीच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मृग नक्षत्राची शेतकरी वाट पाहतोय....

करंजी व परिसरातील शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण केली आहे. आता शेतकरी मृग नक्षत्राची वाट पाहत बसला आहे. या वर्षी मृग नक्षत्र चांगली साथ देईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाने खरीप हंगामात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.